शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

भरसभेत आता झाली का ‘पंचाईत’!

By admin | Updated: February 2, 2015 00:04 IST

तक्रारपेटी निवांत बसवा : आधी सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा !

प्रमोद सुकरे- कराड  पंचायत समितीचा भोंगळ कारभार सातत्याने चव्हाट्यावर येतोय. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकायलाच कुणाला वेळ नाही; मग सोडवायचे तर दूरच. तिथे लोकांना मनमोकळं करायला एक तक्रारपेटी होती़ तीही सध्या गायब आहे़ आता तर महिला सदस्यांना आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नाही म्हणून अश्रू ढाळत चक्क मासिक सभेत दाद मागायला लागतेय. त्यामुळे, ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी महिला सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा,’ असचं म्हणायची वेळ आलीय़ कऱ्हाडला राजकीय पंढरी म्हणून ओळखलं जातं़ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाचा आदर्श घालून दिलाय; पण त्याच पायघड्यावरून चालताना पंचायत समिती सदस्यांनाच कुठे ‘देव’ सापडेना झालाय़ तो हा ‘विठ्ठल’ बरवा... म्हणत, पंचायत समितीचा गाडा पुढे सरकतोय खरा; पण इथे कुणाला कुणाची ‘दया’ही येत नाही अन् त्यामुळे आता काम करण्यात ‘राम’पण राहिला नाही म्हणे !पंचायत समितीच्या सभागृहात राजकीय त्रांगडं आहे़ कोणाचं तरी ओझं कोणाच्या तरी खांद्यावर ठेवत सोयीची युतीच येथे पाहायला मिळतेय. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादीचा सभापती अन् अपक्षांचा उपसभापती इथे पाहायला मिळतोय़ तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपद असणाऱ्यांच्या हातात भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय़ त्यामुळे ‘मूह मे राम और बगल मे़़़’ या पद्धतीने कोण शत्रू अन् कोण मित्र, हेच कळेनास झालंय. इथे सत्तेत कोण अन् सत्तेबाहेर कोण, हेच कधी-कधी समजत नाही़ नोकरीत नवीन असणाऱ्या तरुण अधिकाऱ्याच्या हातात हा कऱ्हाडचा ‘फड’ मिळालाय़ हर‘तरे’ने ते प्रशासनावर पकड बसविण्याचा प्रयत्न करत आहेत; पण गडी अजून ‘मुरलेला’ नाही़ केवळ पंचायत समितीतील राजकीय अस्थिरतेमुळे तो ‘तरलेला’ आहे एवढेच़ नाहीतर कऱ्हाडात काम करायचं सोपं नव्हं बरं ! पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावरच तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडता यावेत म्हणून अनेक वर्षांपासून तक्रारपेटी होती; पण मोठ्या उंचीच्या या अधिकाऱ्यांनी ती पेटीच चार महिन्यांपूर्वी काढून टाकलीय़ अन् हो विचारल्यावर म्हणे, ‘त्याचं कुलूप गंजलं होतं म्हणून काढलीय़ बसवायची आहे; पण त्याला वेळ लागेल़’ आता त्यांना कधी वेळ मिळणार आहे ‘देव’ जाणे़ तक्रारपेटी फोडली तेव्हा त्यात ३० तक्रारी होत्या म्हणे! अन् कुलूप गंजल्याने ते फोडावे लागले. म्हणजे, त्या तक्रारी कधीच्या, कुणाच्या अन् आता त्याचं काय झालं, हे माहीतही नाही; पण हे कमी की काय म्हणून शुक्रवारच्या सभेत महिला सदस्यांवर आपल्या तक्रारींची तड लावली जात नाही म्हणून गहिवरण्याची वेळ आली; पण राजकारणात माहीर असणाऱ्या ‘त्या’ जोडगोळीनं वेळ मारून नेली. प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत़ त्यामुळे अनेक प्रश्नही अनुत्तरित राहतात़ पंचायत समिती सदस्यांचीच अशी ‘पंचाईत’ होत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल. याचा विचारच न केलेला बरा़ पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, तर सामान्यांच्या तक्रारींचे काय ? इथल्याच तक्रारी संपत नसतील, तर नसत्या नव्या तक्रारी कशाला म्हणून तर तक्रारपेटी काढली नसेल ना ? तक्रारपेटीच काढण्यापेक्षा काही तक्रारीच होणार नाहीत, असे प्रशासन राबविण्याची खरंतर गरज आहे; पण हे लक्षात कोण घेतो़ तेव्हा ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी सदस्यांच्या तरी तक्रारी मिटवा म्हणजे झालं !’ ‘भाव’ वाढलाच नाहीअधिकारी दखल घेत नसल्याच्या कारणावरून एक ‘राजा’ मनाचा सदस्य दीड वर्षापूर्वी या सभागृहातून निषेध म्हणून मधूनच उठून गेला होता; पण त्याचे सोयरसुतक फारसे कोणी घेतले नाही़ शेवटी मोठ्या मनाने तो सदस्य पुन्हा सभागृहात येऊन बसू लागलाय. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सदस्यांचा ‘भाव’ तरीही सभागृहात वाढलेला दिसत नाही़ मग नवख्या अन् महिला सदस्यांची कोण किती दाद घेणार? हाच खरा प्रश्न आहे.