शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

..आता कार्यकर्त्यांचा 'डोळा' शासकीय समितींवर; संधी मिळवण्यासाठी नेत्यांकडे प्रयत्न

By प्रमोद सुकरे | Updated: May 1, 2025 10:40 IST

घडतंय- बिघडतंय : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्याने म्हणे हाच योग्य पर्याय

प्रमोद सुकरे 

कराड -  गेल्या ४/५ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या नक्की कधी होतील हे स्पष्टही कोणी सांगत नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांना नेमके कसे सांभाळायचे? हा त्या त्या मतदारसंघातील नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. पण नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिन्यात तालुका व जिल्हास्तरीय शासकीय समितींच्या नियुक्त्या केल्या जातील असे सुतवाच केल्याने आता या कार्यकर्त्यांचा डोळा आता या शासकीय समिती निवडींवर आहे.सध्या इथे तरी संधी मिळावी म्हणून त्यांचे नेत्यांकडे प्रयत्न सुरू दिसत आहेत.

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार कार्यरत आहे. पण तालुका व जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना सांभाळताना आता महायुतीतील नेत्यांनाही कसरत करावी लागत आहे. म्हणून तर भाजपने संघटन पर्व २ च्या माध्यमातून संघटना बळकट करताना यावेळी १०० बुथ चे १ मंडल व त्याला एक तालुकाध्यक्ष असा निकष लावला.त्यामुळे अनेक तालुक्याला २ पेक्षा अधिक तालुकाध्यक्ष मिळाले आहेत. कार्यकर्त्यांना समाधानी करण्याचाच हा एक प्रयत्न मानला जातोय. 

पण एवढ्यावर सगळे कार्यकर्ते समाधानी नाहीत अशा भावना काही दिवसापूर्वी मुंबईत आमदार, खासदार व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितल्याचे समजते. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी मे महिन्यात तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शासकीय समित्यांच्या निवडी केल्या जातील असे सुतोवाच केले आहेत. त्यामुळे 'दुधाची तहान ताकावर भागवू' म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी आता आपला मोर्चा शासकीय समित्यां निवडीकडे वळवल्याचे बोलले जात आहे. 

डोकेदुखी कमी होणार की वाढणार ?

शासकीय समित्यांवर अशासकीय सदस्य निवडले जातात.त्यामुळे या निवडीने काही कार्यकर्त्यांना संधी नक्कीच मिळणार आहे.परिणामी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देता येणार आहे.पण त्यातुन डोकेदुखी कमी होणार की वाढणार? हे कळण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे.कारण यातही सर्वांना संधी देता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. 

राज्यात महायुती असल्याने या नियुक्त्या करताना भाजप बरोबरच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या विधानसभा मतदारसंघात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसे सामावून घेतले जाणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

या आहेत तालुकास्तरीय शासकीय समित्या

भ्रष्टाचार निर्मूलन समिती

समन्वय व पुनर्विलोकन समिती

अवैद्य दारू प्रतिबंध समिती

शांतता समिती व्यसनमुक्ती 

समिती क्रीडा संकुल समिती 

संजय गांधी निराधार अनुदान समिती 

पशु गणना समन्वय व सनियंत्रण समिती

शेतकरी समन्वय समिती

बाल संरक्षण समिती

जलसाक्षरता समिती 

आजी-माजी सैनिक समिती 

नगरपालिका दक्षता समिती 

रेतीघाट तांत्रिक समिती 

तालुका तंटामुक्ती समिती 

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती 

जलयुक्त शिवार अभियान आढावा समिती

वेठबिगार निर्मूलन दक्षता समिती

विशाखा समिती 

राजीव गांधी गतिमान प्रशासन समिती 

रोजगार हमी योजना समिती 

तक्रार निवारण समिती 

विद्युत वितरण नियंत्रण समिती 

रुग्ण कल्याण समिती