शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:39 IST

ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

ठळक मुद्दे*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं

दीपक शिंदे ।सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे जायचे म्हणून अडकून पडलो आहोत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, घरातील साहित्य संपले, भीक तरी कशी मागायची, अशा परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र घेतले; पण वाहतूक पाससाठी गाडी नंबर मागितला जातो आहे. आमच्याकडे कुठे आहे गाडी. सरकारनेचे गाडीची व्यवस्था केली पाहिजे. पण, ते आता नाही, आम्ही मेल्यानंतर गाडीची व्यवस्था करतील, अशी आर्त वेदना परप्रांतीय नागरिक व्यक्त करत आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फर्निचरचे काम करणारे, फरशी काम आणि बांधकामावर काम करणारे अनेक परप्रांतीय रोजगार नाही म्हणून घरी बसून आहेत. रोजगार नाही, पैसे नाहीत, घरातील साहित्य संपले. रोज किती दिवस दुसऱ्यांनी दिलेले जेवण करून दिवस काढायचे, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

रेड झोनमध्ये असल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र पाहिजे, यासाठी आम्ही दिवसभर रांगेत उभे राहून आरोग्य प्रमाणपत्र मिळविले. त्याच्यानंतर आता आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितला जात आहे. कामगार, अशिक्षित लोक कसा फॉर्म भरणार. त्यासाठी सरकारने व्यवस्था केली; पण त्या केंद्रावर गेल्यावर अर्ज भरताना गाडी नंबर मागितला जात आहे. ज्यांच्याकडे दुचाकी नाही ते चारचाकी गाडी कोठून आणणार. गावापर्यंत जायला आणि गाडीवाल्याला देण्यासाठी पैसे तरी पाहिजेत. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पण सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, असे सांगून वाहतूक परवानाच मिळत नाही. त्यामुळे कसे जाणार गावाला. जगलो, वाचलो तर परत येऊ. पण जगलोच नाही तर काय करणार. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते.

अजून दोन दिवस वाट पाहणार...गावाकडे जाण्यासाठी काय व्यवस्था होते का? याबाबत अजून दोन दिवस सर्व परप्रांतीय वाट पाहणार आहेत. त्यानंतर जर कोणतीच व्यवस्था झाली नाही तर मग पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेकजण पायी गेले, भेटेल त्या गाडीने गेले. त्यामुळे आम्हीही तोच निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत आलो आहे.

*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहींऔरंगाबादजवळील अपघाताचा आठवण करून देताना एक परप्रांतीय सांगू लागला. लोक जिवंत असताना त्यांना कोणीच विचारत नाहीत. मात्र, मेल्यानंतर गाडी पाठवितात. हीच व्यवस्था अगोदर केली असती तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस