शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:39 IST

ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

ठळक मुद्दे*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं

दीपक शिंदे ।सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे जायचे म्हणून अडकून पडलो आहोत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, घरातील साहित्य संपले, भीक तरी कशी मागायची, अशा परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र घेतले; पण वाहतूक पाससाठी गाडी नंबर मागितला जातो आहे. आमच्याकडे कुठे आहे गाडी. सरकारनेचे गाडीची व्यवस्था केली पाहिजे. पण, ते आता नाही, आम्ही मेल्यानंतर गाडीची व्यवस्था करतील, अशी आर्त वेदना परप्रांतीय नागरिक व्यक्त करत आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फर्निचरचे काम करणारे, फरशी काम आणि बांधकामावर काम करणारे अनेक परप्रांतीय रोजगार नाही म्हणून घरी बसून आहेत. रोजगार नाही, पैसे नाहीत, घरातील साहित्य संपले. रोज किती दिवस दुसऱ्यांनी दिलेले जेवण करून दिवस काढायचे, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

रेड झोनमध्ये असल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र पाहिजे, यासाठी आम्ही दिवसभर रांगेत उभे राहून आरोग्य प्रमाणपत्र मिळविले. त्याच्यानंतर आता आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितला जात आहे. कामगार, अशिक्षित लोक कसा फॉर्म भरणार. त्यासाठी सरकारने व्यवस्था केली; पण त्या केंद्रावर गेल्यावर अर्ज भरताना गाडी नंबर मागितला जात आहे. ज्यांच्याकडे दुचाकी नाही ते चारचाकी गाडी कोठून आणणार. गावापर्यंत जायला आणि गाडीवाल्याला देण्यासाठी पैसे तरी पाहिजेत. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पण सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, असे सांगून वाहतूक परवानाच मिळत नाही. त्यामुळे कसे जाणार गावाला. जगलो, वाचलो तर परत येऊ. पण जगलोच नाही तर काय करणार. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते.

अजून दोन दिवस वाट पाहणार...गावाकडे जाण्यासाठी काय व्यवस्था होते का? याबाबत अजून दोन दिवस सर्व परप्रांतीय वाट पाहणार आहेत. त्यानंतर जर कोणतीच व्यवस्था झाली नाही तर मग पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेकजण पायी गेले, भेटेल त्या गाडीने गेले. त्यामुळे आम्हीही तोच निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत आलो आहे.

*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहींऔरंगाबादजवळील अपघाताचा आठवण करून देताना एक परप्रांतीय सांगू लागला. लोक जिवंत असताना त्यांना कोणीच विचारत नाहीत. मात्र, मेल्यानंतर गाडी पाठवितात. हीच व्यवस्था अगोदर केली असती तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस