शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:39 IST

ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

ठळक मुद्दे*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं

दीपक शिंदे ।सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे जायचे म्हणून अडकून पडलो आहोत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, घरातील साहित्य संपले, भीक तरी कशी मागायची, अशा परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र घेतले; पण वाहतूक पाससाठी गाडी नंबर मागितला जातो आहे. आमच्याकडे कुठे आहे गाडी. सरकारनेचे गाडीची व्यवस्था केली पाहिजे. पण, ते आता नाही, आम्ही मेल्यानंतर गाडीची व्यवस्था करतील, अशी आर्त वेदना परप्रांतीय नागरिक व्यक्त करत आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फर्निचरचे काम करणारे, फरशी काम आणि बांधकामावर काम करणारे अनेक परप्रांतीय रोजगार नाही म्हणून घरी बसून आहेत. रोजगार नाही, पैसे नाहीत, घरातील साहित्य संपले. रोज किती दिवस दुसऱ्यांनी दिलेले जेवण करून दिवस काढायचे, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

रेड झोनमध्ये असल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र पाहिजे, यासाठी आम्ही दिवसभर रांगेत उभे राहून आरोग्य प्रमाणपत्र मिळविले. त्याच्यानंतर आता आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितला जात आहे. कामगार, अशिक्षित लोक कसा फॉर्म भरणार. त्यासाठी सरकारने व्यवस्था केली; पण त्या केंद्रावर गेल्यावर अर्ज भरताना गाडी नंबर मागितला जात आहे. ज्यांच्याकडे दुचाकी नाही ते चारचाकी गाडी कोठून आणणार. गावापर्यंत जायला आणि गाडीवाल्याला देण्यासाठी पैसे तरी पाहिजेत. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पण सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, असे सांगून वाहतूक परवानाच मिळत नाही. त्यामुळे कसे जाणार गावाला. जगलो, वाचलो तर परत येऊ. पण जगलोच नाही तर काय करणार. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते.

अजून दोन दिवस वाट पाहणार...गावाकडे जाण्यासाठी काय व्यवस्था होते का? याबाबत अजून दोन दिवस सर्व परप्रांतीय वाट पाहणार आहेत. त्यानंतर जर कोणतीच व्यवस्था झाली नाही तर मग पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेकजण पायी गेले, भेटेल त्या गाडीने गेले. त्यामुळे आम्हीही तोच निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत आलो आहे.

*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहींऔरंगाबादजवळील अपघाताचा आठवण करून देताना एक परप्रांतीय सांगू लागला. लोक जिवंत असताना त्यांना कोणीच विचारत नाहीत. मात्र, मेल्यानंतर गाडी पाठवितात. हीच व्यवस्था अगोदर केली असती तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस