शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कऱ्हाड विमानतळाचा विस्तार नाही, अजित पवारांनी मांडले रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:32 IST

कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती.

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाची गरज आहे का? आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करायला लागलोय, त्याला निधी उभा करताना नाकीनऊ आले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तरी आहे. कऱ्हाडला तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे सरकार आहे तोपर्यंत कऱ्हाडला विमानतळ विस्तारीकरण नाही, असे रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.उपमुख्यमंत्री अजित पवार कऱ्हाड दौऱ्यावर असताना विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समितीने त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी पवार यांनी स्पष्टपणे आपले मत सांगितले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रशांत यादव, कृती समितीचे दाजी जमाले, पंजाबराव पाटील, रमेश लवटे, संभाजी साळवे, मोहम्मद आवटे उपस्थित होते.खरंतर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कऱ्हाडला विमानतळाची उभारणी झाली. पुढे दिवंगत डॉ. पतंगराव कदम उद्योगमंत्री असताना येथे नाईट लँडिंगची सुविधा करण्यात आली तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. पण तो प्रस्ताव सुरुवातीपासूनच  वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.कऱ्हाड शहरालगतच्या गोटे, मुंढे व वारुंजी या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी या प्रकल्पात जात आहेत. शिवाय शहरालगतच्या जमिनींना मोठा भाव आहे. तसेच भविष्याचा वेध घेता शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. त्याचाच भाग म्हणून कृती समितीने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना दिलासा दिला. कऱ्हाडला विमानतळ विस्तार करण्याची गरज आहे का? असा उलट प्रश्न त्यानी केला.खरंतर आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करीत आहोत. तेथे त्याची गरज आहे. मात्र त्यालाही आमच्याकडे निधी अपुरा आहे. चाकण, पुणे येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. मोठमोठे उद्योगपती सकाळी विमानाने पुण्यात येऊन संध्याकाळी परत घरी जातात. तेथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. पण कऱ्हाडात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आमचा विस्तार करण्याचा विचार नाही, असे त्यांनी सांगून टाकले.

'लोकमत'ने यापूर्वीच मांडली होती स्पष्ट भूमिकाकऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती. याबाबत काही लोकांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला दुजोरा देत कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

अनेकांनी मोबदला घेणे केले पसंतविमानतळ विस्तारीकरणात ज्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत त्यांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला देण्यात येत आहे .बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी तो मोबदला घेणे पसंत केले असले तरी बरेच शेतकरी आपल्या विरोधावर आजही ठाम आहेत. त्याची प्रचिती रविवारीही आली.

कृती समितीची स्थापना

  • विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिकांना याची झळ लक्षात आली.
  • कसदार जमिनी अधिग्रहण होऊ लागल्या. त्यामुळे बाधितांनी कृती समिती स्थापन करून लढा उभारला. सुरुवातीला या कृती समितीने विस्तारीकरणाला विरोध करीत भव्य मोर्चा काढला.
  • त्याची सांगता सभा कराडच्या लिबर्टी मैदानावर झाली होती. तेव्हा दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर व तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील यांनी सभेला उपस्थित राहून कृती समितीला पाठिंबा दिला होता.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळAjit Pawarअजित पवार