शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नवीन महाबळेश्वर पर्यावरणावरील कृत्रिम संकट, पर्यावरणवादी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:24 IST

चार तालुक्यांतील २३५ गावांतील अनेक कुटुंबांचे लक्ष

सातारा : धरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे. स्थानिकांच्या डोक्यावर बसवलेला नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प पर्यावरणावरील कृत्रिम संकट ठरेल अशी भीती पर्यावरणवादी शिवाजी राऊत यांनी सहा सदस्यीय समितीपुढे व्यक्त केली.नवीन महाबळेश्वर प्रारूप विकास योजनेबद्दल प्राप्त झालेल्या हरकतींवर तापोळा, मेढा, पाटण व सातारा येथे सहा सदस्य समितीच्या समोर हरकतीच्या सुनावण्या पार पडल्या. सुमारे २०० नागरिक व ग्रामपंचायती यांनी मिळून नवीन महाबळेश्वरच्या प्रारूप आराखड्यास विरोध दर्शवला असून, ग्राम अनेक ग्रामपंचायतीने आपल्या हरकती व ठराव लेखी स्वरूपात समिती सादर केले आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने दि. १० ऑक्टोबर २४ रोजी राज्य शासनाने असाधारण राजपत्रानुसार नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्याबाबत संधी दिली होती. दि. ३ ते ८ मार्चदरम्यान वरील चार ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पांतर्गत भूमिपुत्रांनाच प्राधान्य द्यावे. जमीन खरेदी व जमीन फसवणूक व जमिनीचा वाणिज्य वापर याबद्दल महाबळेश्वर, जावली, सातारा, पाटण या तालुक्यांतील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन मगच हा प्रकल्प माथे मारावा, असे राऊत यांनी आपले निवेदनात सांगितले आहे.

रांगेने उभे राहून नोंदविल्या हरकतीसातारा तालुक्यातील ८८ व्यक्तींच्या हरकती घेण्यात आल्या. लोकप्रतिनिधी शिवाय शासन समितीच्या पुढे सुनावणी झाल्यामुळे या सुनावणीत नागरिकांनी आपली तक्रारी रास्त पद्धतीने कथन केल्यावर समितीने त्याबाबत नोंद घेतली. रस्ते विकास महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या अपुऱ्या जागेत रांगेने उभे राहून नागरिकांनी भूमिपुत्रांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात व तोंडी स्वरूपात कथन केल्या.तालुक्यातील २३५ गावांचे लक्षनवीन महाबळेश्वर पर्यावरणाचा नाश भूमिपुत्रांचा विनाश असं होणार की काय याकडे चार तालुक्यांतील २३५ गावांतील अनेक कुटुंबांचे लक्ष लागले आहे. भयग्रस्त सरपंच महिला हा प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने लेखी निवेदन देताना दिसल्या. आपण कितीही कागदे पुढे सरकवली तरीही यातून काही फलस्वरूपात निष्पन्न होइल का, अशी भीतीही येथे येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

माधव गाडगीळ समितीचा पश्चिम घाट पर्यावरण अहवाल केंद्र व राज्य सरकारने स्वीकारला का नाकारला याबद्दल माहिती नाही. आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी संघटनांनी व कोप २२ च्या अहवालात आशियाई खंडातील भारतातील पश्चिम घाट हा अती संवेदनशील आहे. येथे जैवविविधता भुस्तर हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. कोयना हे ११० टीएमसीचे १९६० मेगावॉट वीज तयार करणारे धरण या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे याला बाधा पोहोचणार आहे. - शिवाजी राऊत, पर्यावरणवादी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानenvironmentपर्यावरण