राष्ट्रवादीने फक्त बारामतीचा विकास केला
By Admin | Updated: July 25, 2014 22:15 IST2014-07-25T21:44:17+5:302014-07-25T22:15:51+5:30
रणजितसिंह निंबाळकर यांची टीका

राष्ट्रवादीने फक्त बारामतीचा विकास केला
पिंपोडे बुद्रुक : ‘राज्यात आघाडी सरकार असूनही काँग्रेसने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडत आहे आणि राष्ट्रवादी मात्र फक्त बारामतीच्या विकासावरच भर देत आहे. त्यांना इतरांचे काही देणे-घेणे नाही, अन्यथा फलटण-कोरेगावचे चित्र आज वेगळे दिसले असते,’ अशी टीका काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोनके, ता. कोरेगाव येथे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीप्रसंगी केली.यावेळी स्वराज संघटनेचे जिल्हाधिकारी दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, दत्तात्रय धुमाळ, तानाजी शिंदे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. रामराजेंचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर रणजितसिंहांनी चौफेर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यास फलटणमध्ये मारहाण झाली. यावरून फलटणमधील कायदा-सुव्यवस्थेचा जनता विचार करू लागली आहे. आपण विकासाच्या गप्पा मारता, मग लोकसभेला काय झाले? कुठे गेला विकास? कधी करणार आत्मपरीक्षण? असे वक्तव्य ही निंंबाळकर यांनी केले. (वार्ताहर)
ते फक्त रबरी शिक्का विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे फक्त रबरी शिक्का आहेत. श्रीमतांनी आदेश दिला की, समोर आलेल्या कागदावर सही करायची, एवढेच त्यांचे काम आहे, असा घणाघात निंबाळकर यांनी केला.