शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Navratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:53 IST

coronavirus, navratri, health, sataranews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.

ठळक मुद्देNavratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

नितीन काळेलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान ठरत आहे. याला कारण म्हणजे सेविकांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण याबाबतीत उळुंब येथील अंगणवाडी सेविका व महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर सुदैवी ठरल्या. कारण, त्यांना ग्रामस्थांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. तसेच कुटुंबही पाठीशी राहिले.फलटण तालुक्यातील उळुंबची लोकसंख्या १०५२ आहे. या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर गावात मुंबईतून ९५ लोक आले होते. या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्यांनीही नियमांचे पालन केले.

विशेष म्हणजे अर्चना अहिरेकर यांनी होम क्वारंटाईन झालेल्या काही लोकांना बाजार, भाजीपाला आणि दूध घरी पोहोच केले. अडचणी जाणून घेतल्या; पण गावात कोरोना विषाणू येऊ द्यायचा नाही, यासाठी त्या कार्यरत राहिल्या.आजही त्या घरोघरी भेट देऊन माहिती घेत असतात.

कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का? याची नोंद घेऊन संबंधितांना माहिती दिली जाते. याच कोरोना काळात गावात आरोग्य शिबिर झाले. त्यामधून काही लोकांना मधुमेह, रक्तदाब दिसून आला. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याबाबत लोकांमध्ये जनाजागृती करण्यात अर्चना अहिरकेर यशस्वी ठरल्यात. ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे उळुंब अजूनही कोरोना विषाणूपासून दूर आहे.

गावातील लोक सुशिक्षित आहेत. आवश्यक तेवढ्या कामासाठीच ग्रामस्थ गावाबाहेर पडत आहेत. तर बाहेरच्या गावांतील लोकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे उळुंब गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यापुढेही गावात कोरोना येऊ द्यायचा नाही. ग्रामस्थांचा हा निर्धार अजूनही कायम आहे.- अर्चना अहिरेकर,अंगणवाडी सेविका(८८३०२११५७७)

टॅग्स :Navratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSatara areaसातारा परिसर