शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आहेत. दरम्यान, मायणीत सत्तांतर झाले असून शिरवळमध्येसरपंच भाजपाचा परंतु, सत्ताराष्ट्रवादीची अशी विचित्र परिस्थितीनिर्माण झाली आहे.सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुलीतही सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशिकांत शिंदे गटाने संतोष जाधव यांच्या भाजपा पॅनेलला चारी मुंड्या चित केले. सोनगाव अन् जकातवाडी उदयनराजे गटाकडे तर आसनगाव अन् .... सह बरीच गावे शिवेंद्रसिंहराजे गटाकडे गेली आहेत.कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी, काँगे्रसने आपले वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली आहे. खंडाळा तालुक्यातील असवलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांच्या गटाला पराभवाचा जोरदार धक्का बसला. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवूनहीसरपंचपद गमावले. वाई तालुक्यात किकली, काळंगवाडी व गोवेदिगर ही गावे भाजपाकडे गेली असून, भुर्इंज, कवठे, पांडे काँग्रेसकडे, तर बोपर्डी राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली.जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहिले.भाजपाचा ५५ गावांत सत्ता आल्याचा दावासातारा जिल्ह्यातील ५५ गावांमध्ये भाजपची सत्ता आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. गेली अनेक दशके राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाºया राजकीय बालेकिल्ल्याला भाजपाने हादरा दिला असून, मोदी अन् फडणवीस सरकारच्या सकारात्मक विकासाचाच हा परिपाक आहे, अशी प्रतिक्रिया पावसकर यांनी व्यक्त केली.वाईत धक्कादायक निकालवाई तालुक्यातील किकली, कवठे, पांडे, काळंगवाडी या ग्रामपंचायतीं-मध्ये वीस ते पंचवीस वर्षांची एकाधिकारशाही मोडीत निघत धक्कादायक निकाल हाती लागले.कोरेगावात भाजपाने उघडले खातेग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने अखेर कोरेगाव तालुक्यात खाते उघडले असून, सात ग्रामपंचायतींवर झेंडा फडकाविला आहे. जळगावमध्ये मात्र ‘गड आला पण सिंह गेला,’ अशी अवस्था भाजपाची झाली. राष्टÑवादी काँग्रेसने काँग्रेसच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या असून, एकंबे व कुमठे ग्रामपंचायतीदेखील आता राष्टÑवादीकडे गेल्या आहेत.गिरवीत ‘काँग्रेस’ला धक्काफलटणमध्ये गिरवी ग्रामपंचायत काँगे्रसच्या ताब्यातून गेली. राजेगट व मित्रपक्ष मिळून १८, तर कॉँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केले. शिरवळ खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाºयांना नीरा नदीचा घाट दाखविला.