शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

'नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:31 AM

किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

सातारा : किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे ४० जवान पुलवामात ठार केले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा. देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावध राहिला तर लोकांचं जीणं हराम होईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राज म्हणाले, पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले.नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशात हुकूमशाही आणू पाहत आहेत. लोकांना गुलाम म्हणून त्यांना वागवायचे आहे. देशात मोदी आणि शहा यांची हिटलरशाही आणू द्यायची नसेल तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना राजकीय मदत होऊ द्यायची नाही. तसेच त्यांना मदत करतील, अशा लोकांच्या पाठीशीही राहायचे नाही, असे आवाहनही ठाकरे यांनी शेवटी केले.बेसावध राहिल्यानेच महाराष्टÑ अंधारातमोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठविणारा महाराष्ट्र होता. ब्रिटिशांविरोधात आवाज उठविणाराही महाराष्ट्र होता. मग, मोदी आणि शहांविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?, असा सवाल करतानाच राजा रामदेवराय यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करू शकतात, असेही राज ठाकरे म्हणाले.आमदार परिचारकांवर कारवाई का नाहीभारतीय जनता पार्टीचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द काढतो, तरीही भाजप त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. त्याची आमदारकी कायम राहते आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की, व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही त्यांची जवानांबद्दलची आस्था आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.>पोलिसांसमोर पैसे वाटले जाताहेतनिवडणुकीमध्ये भाजपचे लोक खुलेआम पोलिसांसमोर पैसे वाटत असल्याचा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिसांना नोकरी जाण्याची भीती असल्याने तेही कारवाई करत नाहीत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.>आरडीएक्स आले कुठून?पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात तब्बल ४० जवान मारले गेले. या हल्ल्यासाठी आरडीएक्स वापरले गेले होते. हे आरडीएक्स आले कुठून? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हानही राज ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019satara-pcसातारा