शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

'नरेंद्र मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 06:31 IST

किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

सातारा : किसान मरे तो चुनाव का मुद्दा, जवान मरे चुनाव का मुद्दा क्यों नही हो सकता, असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे ४० जवान पुलवामात ठार केले गेलेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.मोदी, शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा. देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावध राहिला तर लोकांचं जीणं हराम होईल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राज म्हणाले, पाच वर्षांत मोदी व अमित शहा यांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे देश पूर्णपणे अडचणीत आला आहे. देशातील साडेपाच कोटी लोकांना मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे बेरोजगार व्हावे लागले. याच पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांना कंटाळून आत्महत्या केल्या. देशातील अत्याचार थांबलेले नाहीत. तरुणांच्या हातचे काम काढून घेतले गेले.नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशात हुकूमशाही आणू पाहत आहेत. लोकांना गुलाम म्हणून त्यांना वागवायचे आहे. देशात मोदी आणि शहा यांची हिटलरशाही आणू द्यायची नसेल तर कुठल्याही परिस्थितीत त्यांना राजकीय मदत होऊ द्यायची नाही. तसेच त्यांना मदत करतील, अशा लोकांच्या पाठीशीही राहायचे नाही, असे आवाहनही ठाकरे यांनी शेवटी केले.बेसावध राहिल्यानेच महाराष्टÑ अंधारातमोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठविणारा महाराष्ट्र होता. ब्रिटिशांविरोधात आवाज उठविणाराही महाराष्ट्र होता. मग, मोदी आणि शहांविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?, असा सवाल करतानाच राजा रामदेवराय यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता. कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करू शकतात, असेही राज ठाकरे म्हणाले.आमदार परिचारकांवर कारवाई का नाहीभारतीय जनता पार्टीचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द काढतो, तरीही भाजप त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. त्याची आमदारकी कायम राहते आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की, व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही त्यांची जवानांबद्दलची आस्था आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.>पोलिसांसमोर पैसे वाटले जाताहेतनिवडणुकीमध्ये भाजपचे लोक खुलेआम पोलिसांसमोर पैसे वाटत असल्याचा जाहीर आरोप राज ठाकरे यांनी केला. पोलिसांना नोकरी जाण्याची भीती असल्याने तेही कारवाई करत नाहीत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.>आरडीएक्स आले कुठून?पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात तब्बल ४० जवान मारले गेले. या हल्ल्यासाठी आरडीएक्स वापरले गेले होते. हे आरडीएक्स आले कुठून? याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हानही राज ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019satara-pcसातारा