शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 4:47 PM

औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.

ठळक मुद्देकामास केव्हा मुहूर्त लागणार? पुलाची अवस्था बिकटलवकर काम करण्याची मागणी

औंध : औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.रहदारीचा व वाहतुकीसाठी प्रमुख असणारा हा नांदोशी पूल औंध ते सातारा, कºहाड, सांगली, विटा या मार्गावरील वाहतुकीसाठी घाटमाथा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नांदोशी येथील पूल प्रचंड रहदारी व वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंनी खचला आहे. या पुलाची दगडे निसटू लागली आहेत. तसेच या पुलाला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे. मागील पाच वर्षांत अपघातामुळे सुमारे सात ते आठजणांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत.हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा असून, या पुलांवरून येणारी वाहने ही सुसाट येतात. याठिकाणी दोन्ही बाजूला टाकलेले स्पीडब्रेकर ही आता अवजड व सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. नांदोशीसह या मार्गावरील आणखी दोन छोटे पूल ही डबघाईला आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण करून उंची वाढवावी व वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ करावा. तसेच या मार्गावरील अन्य छोटे पूल ही नादुरुस्त झाले आहेत.औंध भागातील औंध ते फलटण, औंध ते कुरोली, वडूज, औंध ते गोपूज रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच या रस्त्यांंचा दर्जा ही बदलला आहे. मात्र, औंध ते घाटमाथा या प्रमुख रहदारीच्या पाच किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण व पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.

सगळीकडे रस्त्याची, पुलाची कामे सुरू आहेत. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या या पुलाचे काम नेमके कशात अडकले आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये. काम लवकरात लवकर सुरू करावे.- नवल थोरात 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर