मुंडेंना आदरांजलीसाठी वधुवरांसह वºहाडी स्तब्ध!
By Admin | Updated: June 6, 2014 00:01 IST2014-06-06T00:00:56+5:302014-06-06T00:01:38+5:30
सनई झाली अबोल : मंगलसमयीही लोकनेत्याचे स्मरण

मुंडेंना आदरांजलीसाठी वधुवरांसह वºहाडी स्तब्ध!
प्रमोद सुकरे ल्ल कºहाड
लग्न समारंभ म्हटलं की मंगल क्षण! सनई चौघडे, हार-तुरे, मान्यवरांची उपस्थिती अन् सत्कार सोहळे तर नित्याचे झाले आहेत. पण, या सगळ्या घाईत, लग्नाच्या धामधुमीत कुणाला श्रद्धांजली वाहण्यात आली तर..? होय, कºहाडात एका लग्न समारंभात भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अन् लग्नघाई बाजूला ठेवून अवघे वºहाडी दोन मिनिटांसाठी स्तब्ध उभे राहिले.
मलकापूर (कºहाड) येथील चंद्रशेखर दोडमणी यांचे चिरंजीव राम व श्रीराम बुधोलिया यांची कन्या नेहा यांचा विवाह बुधवारी येथील मंगल कार्यालयात झाला. उपस्थितांनी अक्षतांची उधळण केली.
सनईच्या मंजुळ स्वरात या नवदाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनात पदार्पण केले. पण, आपल्या जीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची चर्चा इथे सुरूच होती. तेवढ्यात एका कार्यकर्त्याने माईकचा ताबा घेतला अन् दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहण्याचे आवाहन केले. अन् अवघे वºहाडी स्तब्ध उभे राहिले.
एखाद्या नेत्याच्या आकस्मिक जाण्याने त्याचा समाजजीवनावर काय परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहावे लागेल. मुंडेंच्या जाण्याने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातही अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.