शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वादळी पावसाने महावितरणचे आठ लाखांचे नुकसान -रहिमतपूर परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:37 IST

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने महावितरणचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. तुटलेल्या व पडलेल्या पस्तीस वीज खांबावरील वीजवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देवीज जोडणीचे काम सुरू

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने महावितरणचे सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले. तुटलेल्या व पडलेल्या पस्तीस वीज खांबावरील वीजवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, साप येथील काही भाग अद्याप अंधारातच आहे.

गेल्या दहा दिवसांपूर्वी रहिमतपूर शहरासह परिसरातील साप, अपशिंगे व अंभेरी येथे सुमारे तासभर झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे पस्तीस वीज खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे तेथील सगळा परिसर अंधारात गेला होता. दोन दिवसानंतर घरगुती वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, शेतातील अनेक लहान-लहान वस्त्या व विंधन विहिरीचा विद्युत पुरवठा बंद होता. गेल्या दहा दिवसांपासून रहिमतपूर वीज उप केंद्र्रातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चाळीस वीज कर्मचारी तुटलेले खांब व तुटलेल्या वीजवाहिन्या जोडण्याच्या कामात गुंतले आहेत. मात्र अनेक खांबावर झाडे पडून खांबमधूनच तुटल्यामुळे वीज जोडणीस अडचणी येत होत्या. बहुतांशी तुटलेले खांब व तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत.

अद्याप राहिलेल्या विद्युत वाहिन्या व वीजखांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वादळी पावसामुळे महावितरणचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विंधन विहिरीसह वस्त्यांवरील वीजपुरवठा नियमितपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती रहिमतपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे व रहिमतपूर शहर शाखा सहायक अभियंता युवराज वाघ यांनी माहिती दिली. 

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसmahavitaranमहावितरण