शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कऱ्हाडात ‘बळीराजा’चा मोचा

By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST

गुरुवारी आयोजन : पोलिसांच्या गोळ्या झेलण्यास तयार : पाटीर्ल

कऱ्हाड : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांबरोबर शेतकऱ्यांना गुलामगिरीची वागणूक दिली. स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी शासन आणि कारखान्यांशी तडजोड करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले. उसाला प्रतिटन एक रकमी विनाकपात तीन हजार शंभर रुपये मिळावे, या मागणीवर आम्ही ठाम असून, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गुरुवारी (दि. ४) कऱ्हाडात महामोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवर्तक बी. जी. पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील-टाळगावकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे माउली हळणकर, नितीन बागल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.पंजाबराव पाटील-टाळगावकर म्हणाले, ‘कऱ्हाडात होणाऱ्या महामोर्चात संघटनेचे राज्याध्यक्ष सत्तारभाई पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, माजी आमदार पाशा पटेल, लक्ष्मण वडले, माउली हळणकर, शंकर गोडसे यांच्यासह राज्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गुरुवारी (दि. ४) दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनापासून महामोर्चास प्रारंभ होणार असून, हा मोर्चा कृष्णा नाका, चावडी चौक, आझाद चौक ते दत्त चौकातून तहसील कार्यालयावर येणार आहे. महामोर्चात सुमारे एक लाख शेतकरी आंदोलक सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतून सहभागी होणार आहेत. शासन आणि कारखानदारांनी तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न केल्यास दहा दिवसांनंतर साखर आयुक्तालयावर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाला वटणीवर आणण्यासाठी असहकार आंदोलनाची तयारी आम्ही केली असून, पाणीपट्टी, घरपट्टी, वीज बिलांपासून सर्व कर न भरण्याचे आंदोलन शेतकरी करणार आहेत.’बी. जी. पाटील म्हणाले, ‘एफआरपीवर आधारित ऊसदरानेच शेतकऱ्यांचा घात केला आहे. गतवर्षींपेक्षा चालूवर्षी एफआरपीमध्ये फक्त दहा रुपयांची वाढ होऊ शकते, ही मोठी शोकांतिता आहे. उत्पादन खर्चावर आधारित ऊसदरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे जाऊन बोलण्यास खासदार शेट्टी व सदाभाऊ खोत तयार नाहीत. त्यात त्यांचा स्वार्थ दडला आहे.’ (प्रतिनिधी)कारखानदारांवर फौजदारी कराऊसतोडीनंतर १४ दिवसांनी पैसे न दिलेल्या कारखानदारांवर फौजदारीचा कायदा असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कारखान्यांनी ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसांत पैसे दिले का? याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा संघटनेलाही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा बी. जी. पाटील यांनी दिला आहे.