शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीपेक्षा मका, गहूची पेरणी अधिक : रब्बी पेरणी ७७ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:16 IST

पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चित्रच पालटले.

ठळक मुद्दे अवकाळी पाऊस कारणीभूत ; ऊसतोड लवकर नसल्याचाही परिणाम

सातारा : गेल्यावर्षी सततचा आणि नोव्हेंबरमध्येही झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ऊसतोडीचाही हंगाम लांबल्याने जिल्ह्यातील रब्बी पेरणी अद्यापही ७७ टक्क्यांपर्यंतच आहे. अजूनही काही भागात गव्हाची पेरणी होत आहे. त्यामुळे रब्बीची १०० टक्के क्षेत्रावर पेरणी होईल, याची श्वाश्वती नाही. तर यावर्षी टक्केवारीनुसार गहू आणि मकाची पेरणी ज्वारीपेक्षा अधिक झालीय.दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चित्रच पालटले. कारण, गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू झाला.

पूर्व भागात तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यातच नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे जमिनीत पाणी साठले. परिणामी आगाऊ पेरणी केलेलीही वाया गेली. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरू केली. त्यामुळे पेरणीला उशिरा झाला. काही ठिकाणी ज्वारीची दुबार पेरणी झालीय. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र २ लाख १४ हजार ८२३ हेक्टर असलेतरी आतापर्यंत १ लाख ६६ हजार ८७० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी जवळपास ७७ टक्के झालीय. त्यामध्ये ज्वारीची पेरणी ७७ टक्के, गहू ७८, मका ८६, हरभरा ७८ टक्के अशी प्रमुख पिकांची टक्केवारी आहे.

जिल्ह्यात सर्वात जास्त रब्बीचे क्षेत्र माण तालुक्यात २८ हजार ६५५ हेक्टर असून तेथे २५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झालीय. म्हणजे यावर्षी माणमध्ये ज्वारी क्षेत्र कमी झाले आहे. खटावला २२ हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी पेरणी फक्त ८ हजार ६०० हेक्टरवरच झालीय. फलटणला २१ हजारपैकी १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. गहू, हरभरा, मका अशी पिके यंदा येथील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घेतलीत. फलटण तालुक्यात तर गव्हाचे क्षेत्र जवळपास साडेपाच हजार हेक्टर आहे. या तालुक्यात गव्हाचं क्षेत्र वाढलंय. कारण, आतापर्यंत तालुक्यात साडेसहा हजार हेक्टरच्या वर गव्हाचे क्षेत्र झाले आहे. खंडाळ्यात गव्हाची १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालीय. वाईमध्येही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. सातारा, जावळी आणि कºहाडमध्ये गव्हाच्या क्षेत्रात घट झाली आहे.

कोरेगाव, खटाव, माण, फलटण या तालुक्यांत मका क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हरभºयाची पेरणी सातारा, जावळी, कºहाड, खटाव आणि माणमध्ये कमी झालीय. तर कोरेगाव आणि फलटणमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे.

 

  • ऊस लवकर न गेल्याने राने मोकळी नाहीत...

दरवर्षी नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. त्यामुळे उसाला वेळेत तोड येते. गेल्यावर्षी मात्र, डिसेंबरपर्यंत कारखाने सुरूच होत होते. त्यामुळे उसाची तोडणी लवकर झाली नाही. परिणामी ऊसतोडणीनंतर काही शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात; पण ऊसच वेळेत न गेल्याने राने मोकळी झाली नाहीत. त्यामुळे त्यांना पेरणी वेळेत करता आली नाही. आता असे शेतकरी उन्हाळी पिके घेऊ शकतात.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी