शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपल्यानेच दरवाढ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:10 IST

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या.

कऱ्हाड : ‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या. त्यामुळे डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे शक्य असतानाही मोदी सरकारकडून केवळ नफाखोरी आणि लूट सुरू आहे. या दरवाढीमुळे शेतकरी, सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपले आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

येथील तहसील कार्यालयावर सोमवारी कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या भरमसाठ महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार देशभरामध्ये १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान उभारले आहे. त्याचा रविवारी कऱ्हाडमध्ये प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने हा मोर्चा काढला. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्ष नीलम येडगे, काँग्रेसचे कऱ्हाड शहराध्यक्ष राजेंद्र माने, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण, हेमंत जाधव उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे आता लोकांना पुन्हा घोडा, बैलगाडी, सायकल वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळेच ही महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती स्थित व कमी होत असतानाही दरवाढ करून केंद्र सरकार सामान्य माणसांची लूट करत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. सरकार चालवण्यासाठी त्यांना डिझेल, पेट्रोल दरवाढ करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.

दरम्यान, येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या निषेध मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीमध्ये बसून डिझेल, पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चा कोल्हापूर नाक्यावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी