शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

'मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपल्यानेच दरवाढ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:10 IST

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या.

कऱ्हाड : ‘मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मोदींनी सात वर्षांत २३ लाख कोटी रुपये फक्त डिझेल, पेट्रोलवरील कर गोळा केला आहे. निवडणुकीमध्ये निराशाजनक निकाल लागल्यानंतर त्यांनी लगेच डिझेल आणि पेट्रोलच्या किमती कमी केल्या. त्यामुळे डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे शक्य असतानाही मोदी सरकारकडून केवळ नफाखोरी आणि लूट सुरू आहे. या दरवाढीमुळे शेतकरी, सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण संपले आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

येथील तहसील कार्यालयावर सोमवारी कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारने वाढवलेल्या भरमसाठ महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार देशभरामध्ये १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान उभारले आहे. त्याचा रविवारी कऱ्हाडमध्ये प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने हा मोर्चा काढला. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्ष नीलम येडगे, काँग्रेसचे कऱ्हाड शहराध्यक्ष राजेंद्र माने, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण, हेमंत जाधव उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, डिझेल, पेट्रोल दरवाढीमुळे आता लोकांना पुन्हा घोडा, बैलगाडी, सायकल वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळेच ही महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती स्थित व कमी होत असतानाही दरवाढ करून केंद्र सरकार सामान्य माणसांची लूट करत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. सरकार चालवण्यासाठी त्यांना डिझेल, पेट्रोल दरवाढ करण्यापलीकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.

दरम्यान, येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या निषेध मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैलगाडीमध्ये बसून डिझेल, पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चा कोल्हापूर नाक्यावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. त्यानंतर याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी