शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 12:11 IST

कुमुदिनी तलाव पर्यटकांचे आकर्षण : प्रतिव्यक्ती पन्नास रुपये तात्पुरती शुल्क आकारणी 

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी जिल्हा, राज्यभरातून पर्यटकांची वर्दळ सुरू असून पठारावरील विविध पॉईंट पाहण्याची मागणी पर्यटक करत होते. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत आहेत. पठाराचे संवर्धन, संगोपन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू आहे.जुन-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. काही तुरळक फुलांचा, कुमुदिनीच्या फुलांचा सूर्योदय मावळेपर्यंत नोव्हेंबर जातो.फुलांसाठी सध्या पोषक वातावरण असून अद्याप फुलांचा हंगाम सुरू नसून ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राजमार्गावरून कुमुदिनी तलाव, कास धरण दर्शन मचान, नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे पॉईंट पर्यटकांसाठी खुले झाल्यामुळे पर्यटकांना कासचे पर्यटन घडत आहे. पर्यटकांसमवेत सुरक्षा कर्मचारी असून सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटन सुरू आहे.

कास पठार-राजमार्गावर निवाराशेड, स्वच्छतागृहांची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वाॅकीटाॅकीद्वारे संपर्क, अशा अनेकविध सुविधा पावसाळी पर्यटनात उपलब्ध आहेत. परंतु कुमुदिनी तलाव परिसरात निवाऱ्याची कसलीच सोय नसल्याने ऊन, वारा, पावसात आबालवृद्धांपर्यंतची निवाऱ्याची सोय होण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.

फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !पठारावरील विविध पॉईंट पाहण्यास कास पठार खुले आहे. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटनास पूर्णतः बंदी असून कोणी प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रति व्यक्ती पन्नास रुपये तात्पुरते शुल्क आकारून पावसाळी पर्यटन येत्या फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

वनसंपदेचे रक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगाराचे उद्दिष्ट ठेवून विविध पॉईंटच्या निसर्गसौंदर्याचा आनंद मिळण्याच्या हेतूने पर्यटकांच्या मागणीनुसार पावसाळी पर्यटन सुरू केले. पर्यटनावेळी फुलांच्या क्षेत्रात प्रवेश होणार नाही, याची दक्षता घेऊन वनविभागाच्या सूचनांचे पालन करून समिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. -सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन