शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली जळताना मोदी स्वागतात । पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:09 IST

सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री ...

ठळक मुद्देदंगलीत ४२ जणांची हत्या झाल्याचा आरोपदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे ठराविक अधिकार आहेत

सातारा : ‘दिल्ली जळत असतान ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मग्न झाले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जबाबदारी पाळलेली नाही. देशाची प्रतिमा धुळीला मिळविण्याचे काम या जोडगोळीने केले आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

येथील काँगे्रस कमिटीमध्ये शनिवारी आयोजित कार्यकर्ता मेळावा व नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, !एनएसयूआय’राष्ट्रीयचे सरचिटणीस शिवराज मोरे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, अजित पाटील-चिखलीकर, साहेबराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी रजनी पवार, बाबूराव शिंदे, अविनाश फाळके, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक उपस्थित होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे ठराविक अधिकार आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा अधिकार त्या मुख्यमंत्र्यांना नाही. ही संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. दिल्लीमध्ये शांतता राखण्यात अमित शहा यांना पूर्णत: अपयश आलेले आहे. गुजरात राज्यातील २००२ मध्ये झालेल्या दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री मोदी, गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर अठरा वर्षे झाली तरी प्रश्न चिन्ह आहे. हीच जोडगोळी केंद्रात कार्यरत आहे. दिल्लीमध्ये नाहक ४२ जणांचा बळी गेला. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचे काम भाजप करत आहे. निवडणुकांमध्ये एका मागून एक पराभव होत असताना राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने नागरिकत्व कायदा आणला जात आहे. सीएए कायदा हा दोषपूर्ण असा असून, सर्व जाती यात पोळल्या जाणार असल्याने काँगे्रसने कायद्याला तीव्र विरोध केलेला आहे.’

मोदी सरकारमुळं भविष्य अंधारातदेशाची आर्थिक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. बेरोजगारी, महागाईने डोके वर काढलेले आहे. जीएसटी योग्य पद्धतीने गोळा होत नाही. केंद्राकडून राज्याला देण्यात येणारा कराचा वाटाही वेळेत दिला जात नाही. भाजप सरकारचं पितळ आता पूर्णत: उघडे पडले असून, युवकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या परिस्थितीत काँगे्रसला ऐतिहासिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे भाष्यही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले.

 

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आत्तापासूनच बांधणी करणे आवश्यक आहे. युवक काँगे्रसच्यावतीने जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या ३० गटांचा रोड मॅप तयार केला असल्याची माहिती युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी यावेळी दिली.

 

  • जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व आमदार जयकुमार गोरे यांचे निकटवर्तीय किरण बर्गे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर अजित पाटील-चिखलीकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश फाळके हे दोघे व्यासपीठावरून खाली उतरले. चिखलीकर आणि फाळके यांनी आपल्या कृतीतून बर्गे यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केल्याची कुजबूज उपस्थितांमधून सुरू होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण