शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन शाळेत, मुलं ऑनलाईनच!, वर्गात मोबाईलचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 14:12 IST

कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा : जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून ऑफलाईन शाळा हा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यानंतर काही प्रमाणात रिस्क घेऊन राज्य शासनाने शाळा सुरू करायला परवानगी दिली. मात्र, पावणे दोन वर्षांतील मोबाईल वापराची सवय तोडणे मुलांना शक्य होत नसल्याचे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळते. पालकांच्या परवानगीने ऑफलाईन वर्गातही विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल असल्याने ते ऑनलाईन जगात भटकंती करत असल्याचे चित्र वर्गात पहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये मुलं मोबाईलसह दाखल होऊ लागली आहेत. वर्गात शिकविताना मुलांचे फोन वाजणे, वर्ग सुरू असताना स्टेटस अपडेट होणे हे आणि यासह अनेक प्रकार सर्रास वर्गात सुरू झाल्यानंतर शहरातील काही शाळांनी सक्तीने शाळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल न देण्याचे फर्मान काढले आहे. यावर प्रश्नांचा भडिमार करणाऱ्या पालकांनाही त्यांनी मुलांसाठी वेळ देण्याचे सूचित केले. मुलं शाळेत आल्याची आणि घरी गेल्याची खात्री करायला त्यांनी शाळेत किंवा गेटवर असणाऱ्या वॉचमनशी संपर्क साधावा असे सांगितले आहे. विद्यार्थी ज्या खासगी क्लासमध्ये जात आहे तिथे संपर्क करून तो पोहोचल्याची खात्री सहज होऊ शकते. शाळेत मोबाईल दिल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत गुरुकुल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

मोबाईल देण्याची ही सांगितली जातात कारणे

शाळा सुरू झाली असली तरीही विद्यार्थी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी शाळेपर्यंत शेअर रिक्षा, सायकल किंवा चालत जाण्याचा पर्याय स्वीकारतात. शाळेत वेळेवर विद्यार्थी पोहोचला का? याची खात्री फोन शिवाय होत नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचे कारण सांगून फोन देत असल्याचे समर्थन पालकांकडून केले जात आहे.

शाळांची भूमिका

कोरोना काळात पालकांच्या संमतीपत्राने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना न दुखावण्याचे सूत्र शाळा व्यवस्थापनाने स्वीकारले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोबाईलही काही प्रमाणात मान्य असल्याचं शाळा दर्शवतात. काही शाळांनी सक्तीने मोबाईल न देण्याच्या आणि दिला तर जो जप्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर काहींनी वर्गात येण्यापूर्वी मोबाईल बंद करून तो शिक्षकांकडे जमा करण्याचा प्रयत्नही केला आहे.

पूर्वी दंडात्मक आता स्वीकार

कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. शाळेमध्ये निषिद्ध असलेला मोबाईल विद्यार्थी सर्रास घेऊन येतात. अनेकदा हे फोन वर्ग सुरू असताना मोठ्या आवाजात वाजतात. काही विद्यार्थी याद्वारे शाळेतील रिल्स आणि स्टोरीजही ठेवू लागले आहेत. परिणामी वर्गात लक्ष कमी आणि मोबाईलमध्ये जास्त अशी परिस्थिती बघायला मिळते.

ऑनलाईन शाळांमुळे मुलांना मोबाईलची सवय लागली आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर ती सवय मोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने मुलांवर लक्ष असावे, ते सुरक्षित शाळांमध्ये पोहोचावेत यासाठी मोबाईल देणे समर्थनीय नाही. कारण काहीही अडचण आली तर मुलांना मदत करायला समाजातील कोणीही पुढे येते. पण आता मुलांच्या सांगण्याला भुलून पालकही त्यांची भाषा बोलू लागले आहेत. विद्यार्थी वाहतुकीशिवाय येणाऱ्या मुलांनी शाळेत यापूर्वी कधीच मोबाईल आणले नव्हते. - मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीSchoolशाळाMobileमोबाइल