शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन शाळेत, मुलं ऑनलाईनच!, वर्गात मोबाईलचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 14:12 IST

कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा : जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून ऑफलाईन शाळा हा सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यानंतर काही प्रमाणात रिस्क घेऊन राज्य शासनाने शाळा सुरू करायला परवानगी दिली. मात्र, पावणे दोन वर्षांतील मोबाईल वापराची सवय तोडणे मुलांना शक्य होत नसल्याचे चित्र शाळांमध्ये पाहायला मिळते. पालकांच्या परवानगीने ऑफलाईन वर्गातही विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल असल्याने ते ऑनलाईन जगात भटकंती करत असल्याचे चित्र वर्गात पहायला मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये मुलं मोबाईलसह दाखल होऊ लागली आहेत. वर्गात शिकविताना मुलांचे फोन वाजणे, वर्ग सुरू असताना स्टेटस अपडेट होणे हे आणि यासह अनेक प्रकार सर्रास वर्गात सुरू झाल्यानंतर शहरातील काही शाळांनी सक्तीने शाळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल न देण्याचे फर्मान काढले आहे. यावर प्रश्नांचा भडिमार करणाऱ्या पालकांनाही त्यांनी मुलांसाठी वेळ देण्याचे सूचित केले. मुलं शाळेत आल्याची आणि घरी गेल्याची खात्री करायला त्यांनी शाळेत किंवा गेटवर असणाऱ्या वॉचमनशी संपर्क साधावा असे सांगितले आहे. विद्यार्थी ज्या खासगी क्लासमध्ये जात आहे तिथे संपर्क करून तो पोहोचल्याची खात्री सहज होऊ शकते. शाळेत मोबाईल दिल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत गुरुकुल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

मोबाईल देण्याची ही सांगितली जातात कारणे

शाळा सुरू झाली असली तरीही विद्यार्थी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी शाळेपर्यंत शेअर रिक्षा, सायकल किंवा चालत जाण्याचा पर्याय स्वीकारतात. शाळेत वेळेवर विद्यार्थी पोहोचला का? याची खात्री फोन शिवाय होत नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षिततेचे कारण सांगून फोन देत असल्याचे समर्थन पालकांकडून केले जात आहे.

शाळांची भूमिका

कोरोना काळात पालकांच्या संमतीपत्राने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना न दुखावण्याचे सूत्र शाळा व्यवस्थापनाने स्वीकारले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोबाईलही काही प्रमाणात मान्य असल्याचं शाळा दर्शवतात. काही शाळांनी सक्तीने मोबाईल न देण्याच्या आणि दिला तर जो जप्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर काहींनी वर्गात येण्यापूर्वी मोबाईल बंद करून तो शिक्षकांकडे जमा करण्याचा प्रयत्नही केला आहे.

पूर्वी दंडात्मक आता स्वीकार

कोरोनापूर्वी शाळेत मोबाईल आणणे दंडनीय होते. कोरोनानंतर संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. शाळेमध्ये निषिद्ध असलेला मोबाईल विद्यार्थी सर्रास घेऊन येतात. अनेकदा हे फोन वर्ग सुरू असताना मोठ्या आवाजात वाजतात. काही विद्यार्थी याद्वारे शाळेतील रिल्स आणि स्टोरीजही ठेवू लागले आहेत. परिणामी वर्गात लक्ष कमी आणि मोबाईलमध्ये जास्त अशी परिस्थिती बघायला मिळते.

ऑनलाईन शाळांमुळे मुलांना मोबाईलची सवय लागली आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर ती सवय मोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने मुलांवर लक्ष असावे, ते सुरक्षित शाळांमध्ये पोहोचावेत यासाठी मोबाईल देणे समर्थनीय नाही. कारण काहीही अडचण आली तर मुलांना मदत करायला समाजातील कोणीही पुढे येते. पण आता मुलांच्या सांगण्याला भुलून पालकही त्यांची भाषा बोलू लागले आहेत. विद्यार्थी वाहतुकीशिवाय येणाऱ्या मुलांनी शाळेत यापूर्वी कधीच मोबाईल आणले नव्हते. - मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, एसईएमएस

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीSchoolशाळाMobileमोबाइल