शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसंगमावरील गैरसोयींबाबत मनसे आक्रमक

By admin | Updated: August 9, 2015 21:05 IST

आंदोलनाचा इशारा : तीन कोटीच्या निधीतून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

कऱ्हाड : येथील प्रीतिसंगम परिसर सध्या गैरसोयींच्या विळख्यात सापडला आहे. प्रीतिसंगमाला अनेक पर्यटक, अभ्यासक तसेच भाविक भेटी देत असताना याठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, तीन कोटींचा निधी उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या निधीचा वापर करून तातडीने येथे सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना निवेदन दिले असून, योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कऱ्हाडात अनेक वास्तू आहेत ज्या वास्तूंना पर्यटक व भाविक भेट देत असतात. मात्र, त्या वास्तूंच्या देखभाल, सुशोभीकरण व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. प्रीतिसंगम परिसरही भाविक व अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, या परिसरात नेहमीच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसते. येथे स्वच्छतागृह नाहीत. वीज दिव्यांची सोय नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेलेले नाहीत. प्रेमीयुगुलांबाबत कोणतीही उपाययोजना होत नाही. तसेच मद्यपी व धूमस्टाईलने दुचाकी चालविणाऱ्यांवरही कारवाई केली जात नाही. येथे पार्किंगचा अभाव आहे. वाहने घाट रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे पार्क केलेली दिसतात. या सर्व बाबींकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रीतिसंगम परिसरासाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, आजअखेर या निधीचा वापर करण्यात आलेला नाही. या निधीचा तातडीने वापर करून येथे सोयीसुविधा उभाराव्यात. ते करीत असताना प्रामुख्याने येथील गैरसोयींचा विचार करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीस चौकीची गरजप्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनपटावरील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पकृती उभारावी, स्वागत कमान उभी करावी, प्रीतिसंगमाची माहिती देणारा फलक उभारावा व येथे स्वतंत्र पोलीस चौकीची उभारणी करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.