शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या बगलबच्च्यांकडून जनतेची दिशाभूल - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 17:53 IST

‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना त्यांचे हे बगलबच्चे शरद पवारांवर टीका करत मस्तवालपणे सत्तेचा

दहिवडी (सातारा) : ‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे पंतप्रधान मोदी म्हणत असताना त्यांचे हे बगलबच्चे शरद पवारांवर टीका करत मस्तवालपणे सत्तेचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. या विरोधातच हल्लाबोल मोर्चा काढला जात आहे,’ असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

दहिवडी, ता. माण येथे राष्ट्रवादी पक्षाचा हल्लाबोल मोर्चा आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार विजयसिंह मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप चव्हाण, दत्तामामा भरणे, संग्राम कोते, संजीवराजे नाईक-निंबाळकर, तेजस शिंदे, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, चित्राताई वाघ, सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ, सोनाली पोळ, सुरेखाताई पखाले, कविता म्हेत्रे, संदीप पोळ, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. 

 अजित पवार म्हणाले, ‘२०१७ च्या विधानपरिषदेसाठी प्रभाकर घार्गे निवडणूक लढवायला नको म्हणाले, मग शरद पवारांनी शेखर गोरेंना उमेदवारी दिली. या सरकारने शेतकºयांची चेष्टा लावली असून, फक्त जाहिरातबाजी मार्केटिंगवर हे सरकार काम करताना दिसून येत आहे.’

 माण-खटाव तालुक्यात समज-गैरसमज न करता एकसंघ राहून सर्वांनी बरोबर यावे. जो चांगले काम करेल, त्याचाच विचार केला जाणार असून, शरद पवार हेच या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील. येणाºया निवडणुकीत पाटण, कºहाड, माण-खटावसह सर्व तालुक्यांतील आमदार व दोन खासदार निवडून आणावेत, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

 धनंजय मुंडे म्हणाले, ‘सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरत हल्लाबोल करत आहे. एक-एक टप्पा पुढे जातोय, तसतशी राष्ट्रवादीची धसकी या सरकारला बसताना दिसून येत आहे. भाजपच्या मनात राष्ट्रवादीची दहशत निर्माण झाली आहे.’

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘शेतकºयांच्या हिताचा केंद्रशासनाकडून निर्णय घेतला जात नाही. सरसकट कर्जमाफी होईपर्यंत राष्ट्रवादी आवाज उठवणार असून, कर्जमाफीसाठी तुम्हाला रांगेत उभे राहायला लावणाºया सरकारला आॅफलाईन करण्याची वेळ आली आहे.’ यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे यांनी मनोगते व्यक्त केली. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले.  अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप पोळ यांनी आभार मानले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस