शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

राजकारण विसरून कामे करणे मिरढेकरांचे वैशिष्ट्य् : संजीवराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

वाठार निंबाळकर : ‘निवडणूक झाली की राजकारण विसरून विकासकामे करण्यासाठी एकत्रित येणे ही मिरढे गावातील परंपरा इतर गावांसाठी प्रेरणादायी ...

वाठार निंबाळकर : ‘निवडणूक झाली की राजकारण विसरून विकासकामे करण्यासाठी एकत्रित येणे ही मिरढे गावातील परंपरा इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

मिरढे येथील ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, मिरढे ते शिंदेवाडा रस्ता भूमिपूजन, प्राथमिक शाळा कंपाऊंड भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष गणेश दडस, माजी सरपंच संगीता लोंढे, सरपंच नामदेव काळे, उपसरपंच संगीता यादव उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, ‘मिरढे गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे शंभराहून अधिक रुग्ण होते. मात्र गावाची एकी असल्याने उत्तम नियोजन करून या महामारीमध्ये गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ यशस्वी झाले. मिरढे गावाने तीस वर्षे राजकारण करताना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. राजकारण करताना विकास ही मोठ्या प्रमाणात करून गाव आदर्श करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. यापुढेही गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’

यावेळी माणिकराव सोनवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. बजरंग कचरे, बापूराव पोकळे, संजय कचरे, तानाजी गावडे, शंकर गायकवाड, रमेश लोंढे, चांगदेव पोकळे, ज्ञानदेव गावडे, सुभाष यादव, ग्रामसेविका व्ही. आर. सोनवणे, सदस्य कुंडलिक चव्हाण, नवनाथ यादव, रूपाली मदने, साधना जगताप, मोनाली शेंडगे, भीमराव कचरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच नामदेव काळे यांनी स्वागत केले. भागवत काशीद यांनी आभार मानले.