शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Satara: माणमधील दुष्काळावरुन मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंना टोला, म्हणाले..

By नितीन काळेल | Updated: December 25, 2024 18:44 IST

सातारा : साताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळी माणमध्ये गेले ...

सातारा : साताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळीमाणमध्ये गेले नाही. दरवर्षी एक किलोमीटरचे काम झाले असते तर पाणी पोहोचले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते आले. पण, २० वर्षे मंत्री राहूनही दुष्काळ गेला नाही. त्यांचं कालचक्र सुरू झालं आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना नाव न घेता लगावला. दरम्यान, कार्यशाळेत नेत्यांनी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार बोलून दाखवला.साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये भाजपची पक्ष नोंदणी अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. यावेळी मंत्री गोरे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अॅड. भरत पाटील, सुनील काटकर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, अविनाश कदम, चिन्मय कुलकर्णी आदी उपस्थित होते.मंत्री गोरे म्हणाले, भाजपकडे कधीही मंत्रीपद मागायला गेलो नव्हतो. तरीही पक्षाने सर्वसामान्य घरातील पोराला मंत्री केलं. हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. कारण, दुसऱ्या पक्षानं जिल्हाध्यक्षही केलं नव्हतं. आता पक्षनोंदणी करुन अधिकाधिक सभासद करायचे आहेत. पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांची निवडणूक आहे. आतापासून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाऊ. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली पाहिजे. सत्ता असताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला नाही. आता तर सत्ता असल्याने चिंता करु नका. कार्यकर्त्यांचा सन्मान राखना जाईल तसेच गावात काम करताना अडचण येणार नाही हेही पाहिले जाईल.मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार खोलवर रुजले असे म्हटले जात होते. पण, आताच्या निवडणुकीत सर्वांनी काम केल्याने बदल घडला हे आपण राज्याला दाखवून दिले आहे. आता पक्ष सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वीपणे पार पाडायचे आहे. कारण, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होत आहे. या सर्व संस्था भाजपच्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्थानिक स्वराज संस्था जिंकायचीच याची खुणगाठ बांधा. पुढील १५ ते २० वर्षे विरोधक उभे राहतील असे वाटत नाही. तरीही आपण गाफील राहू नये. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विठ्ठल बलशेटवार यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरman-acमाणJaykumar Goreजयकुमार गोरेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरdroughtदुष्काळ