शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

म्हसवडकर नागरिक पितात क्षारयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:39 AM

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले ...

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून, पालिका नागरिकांना पिण्यासाठी नेमके कुठले पाणी सोडते? पालिकेचा फिल्टर पाॅईंट असूनही नागरिकांना बिगरफिल्टर क्षारयुक्त पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सोडले जातेय. मग, फिल्टरचे पाणी नेमके कुठे मुरतेय ? आधीच कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली नागरिक आहेत. त्यात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसवड पालिका सत्ताधारी मंडळींच्या दुर्लक्षामुळे शहरातील व पालिका हद्दीतील नागरिकांना, सर्व फिल्टरची यंत्रणा असूनही बिगरफिल्टरचे पाणी पालिका गत अनेक महिन्यांपासून देत असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाब मुतखडा असे पोटाचे अनेक आजार होऊ लागले आहेत. याकडे पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी डोळेझाक करीत असल्याने, शहरातील नागरिकांचे मात्र आरोग्य बिघडत चालले आहे. म्हसवड पालिका हद्दीतील नागरिकांना माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जाते? असून या पाण्याचे फिल्टरेशन पाॅईंटवर कारखेल (ता. माण) येथे केले जाते. पण या योजनेचे पाणी नागरिकांना गत अनेक महिन्यांपासून मिळत नाही. सध्या कुठले तरी विहिरीचे पाणी सोडले जातेय. तेही फिल्टर केलेले नाही. बिगरफिल्टरचे पाणी पिल्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले, निरोगी राहण्यासाठी पालिकेने क्षारमुक्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका, त्यात क्षारयुक्त पाणी यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील जुना पोस्ट परिसर ते नवी पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजू दीड महिन्यापूर्वीपासून गटार बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने खोदल्या असून हे काम करीत असताना येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनच्या पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पाईपमध्ये गटारीचे पाणी जात असल्याने या भागातील नागरिक दीड महिन्यापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त मिसळलेले पाणी नळाद्वारे भरत आहेत. याचे सोयरसुतक ना ठेकेदाराला ना पालिकेला. तरी याकडे पालिकेने वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा या भागातील नागरिकांच्या उग्र रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल.