शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मीटरमध्ये बिघाड; मायणी परिसरात ग्राहकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 18:03 IST

घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देवीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकचुकीचे रिपोर्ट, आर्थिक फटका ग्राहकांना

मायणी (सातारा) : घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.मायणी परिसरात वीज वितरण कंपनीचे हजार वीजग्राहक आहेत. या ग्राहकांना त्या कंपनीमार्फ त घरगुती व औद्योगिक वापरासाठीचा वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या बिलाचे लाईटबिल प्रती महिना येत असते ते भरणे ग्राहकाला बंधनकारक आहे. मुदतीपेक्षा उशीर झाल्यानंतर ग्राहकांकडून दंडापोटी ठराविक रक्कम आकारली जाते. तसेच या ग्राहकांची वीज कनेक्शन व इतर तक्रारींचे निवारण करण्याचे कामही याच कंपनीचे असते.

मात्र असे असतानाही ही कंपनी ग्राहकांना सेवा देण्यात या कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, कामगार टाळाटाळ करतात. कंपनीमार्फ त देण्यात आलेले वीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे असल्यामुळे या मीटरमध्ये वारंवार बिघाड होतो.

अशा बिघाडाची तक्रार देण्यासाठी ग्राहक गेल्यानंतर मीटर शिल्लक नाहीत, तीन-चार महिने थांबावे लागेल, मीटरची तपासणी करावी लागेल, मीटर काढून आणा अशी उत्तरे दिली जातात. त्याच मीटर तपासणीसाठी ग्राहकाला मीटर घेऊन वडूजला जावे लागते. त्या ठिकाणी असलेले अधिकारी अशीच काही तरी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना त्रास देत असतात.

यापूर्वी हेच ग्राहक साधा मीटर, साठ-शंभर होल्टेजचे साधे बल्ब व ट्यूबलाईट वापरत होते. त्या वेळी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून प्रती तीन महिन्याला वीज आकारणी करत असतानाही लोकांना शंभर रुपये, दोनशे रुपयेच्या आता लाईट बिल येत होते.

आज मात्र प्रत्येक घरामध्ये एलईडी, सीएफएल हे कमी वीज वापरणारे बल्ब असतानाही या कंपनीकडून प्रती महिना बिल हे तीनशे ते तीनशेहून अधिक येत आहे. त्यामुळे नक्की कोणता घोटाळा होत आहे? हे मात्र कळण्यास मार्ग नाही.

प्रती महिन्यात देण्यात येणाऱ्या लाईट बिलांमध्ये ग्राहकांच्या मीटरचा फोटो नसतो. असला तरीही चुकीचा असतो. यासह चुका नित्याच्याच बनलेल्या असतानाही संबंधित अधिकारी या गोष्टींकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी नक्की कोणाच्या फायद्यासाठी व सेवेसाठी आहे, हेच कळायला मार्ग नाही. आर्थिक व मानसिक संकटात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.चुकीचे रिपोर्ट व आर्थिक फटकामहिन्याचे हजार-दोन हजार रुपये बिल आल्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर ते मीटर तपासून घेण्याचा सल्ला देतात. मात्र, दुरुस्ती विभागाकडून मीटरमध्ये काही दोष नाही, असा दाखला देण्यात येतो. त्यानंतर लगेच पूर्ण रक्कम वसूल केली जाते. म्हणजे वाढीव बिलाचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकमीटरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो मीटर वडूज या ठिकाणी जावे लागते. मायणी, कलेढोण परिसरांतून एक वेळा जाण्याचा खर्च १०० रुपये येतोे. किमान दोन ते तीनवेळा जावे लागते. या ठिकाणी १५० रुपयांचे चलन घ्यावे लागते. त्यामुळे हे दुरुस्तीचे दुसरे केंद्र मायणीत व्हावे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर