शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मीटरमध्ये बिघाड; मायणी परिसरात ग्राहकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 18:03 IST

घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देवीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकचुकीचे रिपोर्ट, आर्थिक फटका ग्राहकांना

मायणी (सातारा) : घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.मायणी परिसरात वीज वितरण कंपनीचे हजार वीजग्राहक आहेत. या ग्राहकांना त्या कंपनीमार्फ त घरगुती व औद्योगिक वापरासाठीचा वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या बिलाचे लाईटबिल प्रती महिना येत असते ते भरणे ग्राहकाला बंधनकारक आहे. मुदतीपेक्षा उशीर झाल्यानंतर ग्राहकांकडून दंडापोटी ठराविक रक्कम आकारली जाते. तसेच या ग्राहकांची वीज कनेक्शन व इतर तक्रारींचे निवारण करण्याचे कामही याच कंपनीचे असते.

मात्र असे असतानाही ही कंपनी ग्राहकांना सेवा देण्यात या कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, कामगार टाळाटाळ करतात. कंपनीमार्फ त देण्यात आलेले वीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे असल्यामुळे या मीटरमध्ये वारंवार बिघाड होतो.

अशा बिघाडाची तक्रार देण्यासाठी ग्राहक गेल्यानंतर मीटर शिल्लक नाहीत, तीन-चार महिने थांबावे लागेल, मीटरची तपासणी करावी लागेल, मीटर काढून आणा अशी उत्तरे दिली जातात. त्याच मीटर तपासणीसाठी ग्राहकाला मीटर घेऊन वडूजला जावे लागते. त्या ठिकाणी असलेले अधिकारी अशीच काही तरी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना त्रास देत असतात.

यापूर्वी हेच ग्राहक साधा मीटर, साठ-शंभर होल्टेजचे साधे बल्ब व ट्यूबलाईट वापरत होते. त्या वेळी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून प्रती तीन महिन्याला वीज आकारणी करत असतानाही लोकांना शंभर रुपये, दोनशे रुपयेच्या आता लाईट बिल येत होते.

आज मात्र प्रत्येक घरामध्ये एलईडी, सीएफएल हे कमी वीज वापरणारे बल्ब असतानाही या कंपनीकडून प्रती महिना बिल हे तीनशे ते तीनशेहून अधिक येत आहे. त्यामुळे नक्की कोणता घोटाळा होत आहे? हे मात्र कळण्यास मार्ग नाही.

प्रती महिन्यात देण्यात येणाऱ्या लाईट बिलांमध्ये ग्राहकांच्या मीटरचा फोटो नसतो. असला तरीही चुकीचा असतो. यासह चुका नित्याच्याच बनलेल्या असतानाही संबंधित अधिकारी या गोष्टींकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी नक्की कोणाच्या फायद्यासाठी व सेवेसाठी आहे, हेच कळायला मार्ग नाही. आर्थिक व मानसिक संकटात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.चुकीचे रिपोर्ट व आर्थिक फटकामहिन्याचे हजार-दोन हजार रुपये बिल आल्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर ते मीटर तपासून घेण्याचा सल्ला देतात. मात्र, दुरुस्ती विभागाकडून मीटरमध्ये काही दोष नाही, असा दाखला देण्यात येतो. त्यानंतर लगेच पूर्ण रक्कम वसूल केली जाते. म्हणजे वाढीव बिलाचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकमीटरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो मीटर वडूज या ठिकाणी जावे लागते. मायणी, कलेढोण परिसरांतून एक वेळा जाण्याचा खर्च १०० रुपये येतोे. किमान दोन ते तीनवेळा जावे लागते. या ठिकाणी १५० रुपयांचे चलन घ्यावे लागते. त्यामुळे हे दुरुस्तीचे दुसरे केंद्र मायणीत व्हावे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर