शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मीटरमध्ये बिघाड; मायणी परिसरात ग्राहकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 18:03 IST

घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

ठळक मुद्देवीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकचुकीचे रिपोर्ट, आर्थिक फटका ग्राहकांना

मायणी (सातारा) : घरगुती व औद्योगिक ग्राहकांसाठी देण्यात आलेल्या मीटरमध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे येणारे लाईट बिल कित्येक पटीने अधिक येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.मायणी परिसरात वीज वितरण कंपनीचे हजार वीजग्राहक आहेत. या ग्राहकांना त्या कंपनीमार्फ त घरगुती व औद्योगिक वापरासाठीचा वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांनी वापरलेल्या बिलाचे लाईटबिल प्रती महिना येत असते ते भरणे ग्राहकाला बंधनकारक आहे. मुदतीपेक्षा उशीर झाल्यानंतर ग्राहकांकडून दंडापोटी ठराविक रक्कम आकारली जाते. तसेच या ग्राहकांची वीज कनेक्शन व इतर तक्रारींचे निवारण करण्याचे कामही याच कंपनीचे असते.

मात्र असे असतानाही ही कंपनी ग्राहकांना सेवा देण्यात या कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी, कामगार टाळाटाळ करतात. कंपनीमार्फ त देण्यात आलेले वीज आकारणीचे मीटर हे हलक्या प्रतीचे असल्यामुळे या मीटरमध्ये वारंवार बिघाड होतो.

अशा बिघाडाची तक्रार देण्यासाठी ग्राहक गेल्यानंतर मीटर शिल्लक नाहीत, तीन-चार महिने थांबावे लागेल, मीटरची तपासणी करावी लागेल, मीटर काढून आणा अशी उत्तरे दिली जातात. त्याच मीटर तपासणीसाठी ग्राहकाला मीटर घेऊन वडूजला जावे लागते. त्या ठिकाणी असलेले अधिकारी अशीच काही तरी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना त्रास देत असतात.

यापूर्वी हेच ग्राहक साधा मीटर, साठ-शंभर होल्टेजचे साधे बल्ब व ट्यूबलाईट वापरत होते. त्या वेळी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून प्रती तीन महिन्याला वीज आकारणी करत असतानाही लोकांना शंभर रुपये, दोनशे रुपयेच्या आता लाईट बिल येत होते.

आज मात्र प्रत्येक घरामध्ये एलईडी, सीएफएल हे कमी वीज वापरणारे बल्ब असतानाही या कंपनीकडून प्रती महिना बिल हे तीनशे ते तीनशेहून अधिक येत आहे. त्यामुळे नक्की कोणता घोटाळा होत आहे? हे मात्र कळण्यास मार्ग नाही.

प्रती महिन्यात देण्यात येणाऱ्या लाईट बिलांमध्ये ग्राहकांच्या मीटरचा फोटो नसतो. असला तरीही चुकीचा असतो. यासह चुका नित्याच्याच बनलेल्या असतानाही संबंधित अधिकारी या गोष्टींकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनी नक्की कोणाच्या फायद्यासाठी व सेवेसाठी आहे, हेच कळायला मार्ग नाही. आर्थिक व मानसिक संकटात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.चुकीचे रिपोर्ट व आर्थिक फटकामहिन्याचे हजार-दोन हजार रुपये बिल आल्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर ते मीटर तपासून घेण्याचा सल्ला देतात. मात्र, दुरुस्ती विभागाकडून मीटरमध्ये काही दोष नाही, असा दाखला देण्यात येतो. त्यानंतर लगेच पूर्ण रक्कम वसूल केली जाते. म्हणजे वाढीव बिलाचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.दुरुस्तीपेक्षा प्रवासाचा खर्च अधिकमीटरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो मीटर वडूज या ठिकाणी जावे लागते. मायणी, कलेढोण परिसरांतून एक वेळा जाण्याचा खर्च १०० रुपये येतोे. किमान दोन ते तीनवेळा जावे लागते. या ठिकाणी १५० रुपयांचे चलन घ्यावे लागते. त्यामुळे हे दुरुस्तीचे दुसरे केंद्र मायणीत व्हावे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर