शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून सोबत आलेल्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्थाही या काळात मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावाकडे कोणालाही औषधोपचाराच्या अनुषंगाने कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत.

कोरोनाकाळाची सुरुवात झाल्यानंतर गतवर्षी मुंबईकरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. गावात तीन महिने राहिल्यानंतर येथील परिस्थितीची जाणीव तमाम महानगरांत वास्तव्यास असणाऱ्यांना झाली. परिणामी तीन महिन्यांत गावकऱ्यांकडून मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीतून त्यांनाही गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधीच हवी होती. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसह, प्लाझ्मा आणि अन्य काही औषधे मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध होत आहेत. याची माहिती असल्याने विविध गावांतील प्रमुख ग्रामस्थांना घेऊन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. गावात ज्यांना कोणाला औषधोपचारासह बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी मदत उभी करण्याचे काम ही मंडळी आपले दैनंदिन काम सांभाळून करीत आहेत. ज्या गोष्टी साताऱ्यात उपलब्ध होत नाहीत त्या मुंबई आणि पुण्याहून मिळवून देण्यासाठीही ही मंडळी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातून गाडी मुंबईला जाऊन आवश्‍यक रुग्णांसाठी हे इंजेक्शन आणले जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या गाडीचा खर्च विभागून करतात, तर गाडी घेऊन आलेल्यांना पॅक जेवण देण्याची जबाबदारी या महानगरांतील सातारकरांनी घेतली आहे.

कोविडने माणसांना माणसांपासून दूर केलं असलं तरीही माणसातील माणुसकी जागृत करण्यासाठीही का काळ उपयुक्त ठरला. कोणी ओळखीचा नसला तरी आपल्या जिल्ह्याचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी धावणारी ही मंडळी खरी कोविड योद्धे आहेत. महानगरांमध्ये विस्तीर्ण व्यापात अडकूनही मातृभूमीच्या सेवेसाठी आपले योगदान असावे, ही त्यांची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चौकट :

पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावासाठी चक्क बोअर !

जावळी तालुक्यातील भामघर गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासह खर्चासाठीही करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईकर मंडळी गावात आली असता, त्यांना या पाण्याचा रंग बदललेला दिसला. खात्री करायची म्हणून काहींनी हे पाणी बाटलीतून मुंबईत तपासणीसाठी पाठवलं. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांनी विजय सावले यांच्या पुढाकाराने गावात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी चक्क बोअर मारून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढला.

कोट :

मातृभूमीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठ्या शहरांत जाऊन काम करू शकलो. गेल्या महिन्याभरात जावळीत रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधे उपलब्ध करून देण्यात यश आले. आपल्या भागातील कोणीही आले तरी त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रसंग बाका आहे; पण सर्वांच्या सहकार्यातून गावाकडील आपल्या लोकांची कुठेही हेळसांड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सेवा पुरविताना आत्मिक समाधान मिळते.

- विजय सावले, भामघर