शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मायणी प्रादेशिक पाणी योजनेची घरघर कधी थांबणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र ...

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र या प्रादेशिक योजनेचा योग्य अभ्यास न करता याच धर्तीवर अनेक गावे एकत्र करून विविध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार केल्या व आज सर्व योजना अडचणीत सापडल्या आहेत.

खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणीसह मोराळे, मरडवाक, चितळी व गुंडेवाडी (मराठानगर) या पाच गावांसाठी योजना तयार करण्यात आली. मायणी व चितळी लोकसंख्या व क्षेत्रफळाने मोठी आहे, तर इतर गावे लहान आहेत. या गावांना किती वेळ पाणी द्यायचे याचे नियोजन करण्यात आले. वीजपुरवठा २४ तास नसल्याने अडचण निर्माण होत होती. त्यानंतर शासनाने या प्रादेशिक योजनांसाठी २४ तास वीजपुरवठा देण्याची सोय निर्माण केली.

विजेचा कमी अधिक दाब, मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे अशा विविध कारणांमुळे प्रत्येक गावाला मिळणारे पाणी व वेळेचे नियोजन हळूहळू बिघडू लागले. त्यामुळे योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी काहीशी झाली. तीन वर्षांपूर्वी या योजनेतून या चार गावांनी विविध कारणे काढून काढता पाय घेतला.

मायणीसाठी इतर योजना नसल्याने मायणीने ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालवण्याचे ठरविले. पाईपलाईन व विद्युत मोटार कायम ठेवली. प्रचंड लाईट बिल, पूर्वीची थकबाकी तसेच थकबाकीवरील व्याज, अशा विविध कारणांमुळे थकबाकी तीन कोटींवर गेली.

मायणी ग्रामपंचायतीने वेळोवेळी येणारे लाईट बिल व काहीशी थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या थकबाकीचा आकडा त्यावरील व्याजामुळे मायणी प्रादेशिक योजनेला घरघर लागली आहे. त्यामुळे शासनाने या थकबाकीबाबत योग्य तोडगा काढून ग्रामपंचायतीला या अवाजवी वीजबिल व वीजबिलावर व्याज यातून सुटका करावी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

(कोट)

योजनेची थकबाकी पाच गावांतून विभागून द्या, अशी मागणी मंत्रालय बैठकीत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत वेळोवेळी केली आहे. चोऱ्या, दरोडे यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे खटाव-माण तालुक्यांतील पथदिव्यांचे तोडण्याचा आदेश मागे घ्यावा, तसेच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे थकीत वीजबिल एकरकमी भरण्याचा तगादा लावू नये, शेतकरीवर्ग अडचणीत जाईल, या बाबींचा सहानुभूती विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.

-डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार