शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

मायणी प्रादेशिक पाणी योजनेची घरघर कधी थांबणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र ...

मायणी : शासनामार्फत कायम दुष्काळी असलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र या प्रादेशिक योजनेचा योग्य अभ्यास न करता याच धर्तीवर अनेक गावे एकत्र करून विविध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार केल्या व आज सर्व योजना अडचणीत सापडल्या आहेत.

खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पातून मायणीसह मोराळे, मरडवाक, चितळी व गुंडेवाडी (मराठानगर) या पाच गावांसाठी योजना तयार करण्यात आली. मायणी व चितळी लोकसंख्या व क्षेत्रफळाने मोठी आहे, तर इतर गावे लहान आहेत. या गावांना किती वेळ पाणी द्यायचे याचे नियोजन करण्यात आले. वीजपुरवठा २४ तास नसल्याने अडचण निर्माण होत होती. त्यानंतर शासनाने या प्रादेशिक योजनांसाठी २४ तास वीजपुरवठा देण्याची सोय निर्माण केली.

विजेचा कमी अधिक दाब, मोटर जळणे, पाईपलाईन फुटणे अशा विविध कारणांमुळे प्रत्येक गावाला मिळणारे पाणी व वेळेचे नियोजन हळूहळू बिघडू लागले. त्यामुळे योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी काहीशी झाली. तीन वर्षांपूर्वी या योजनेतून या चार गावांनी विविध कारणे काढून काढता पाय घेतला.

मायणीसाठी इतर योजना नसल्याने मायणीने ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालवण्याचे ठरविले. पाईपलाईन व विद्युत मोटार कायम ठेवली. प्रचंड लाईट बिल, पूर्वीची थकबाकी तसेच थकबाकीवरील व्याज, अशा विविध कारणांमुळे थकबाकी तीन कोटींवर गेली.

मायणी ग्रामपंचायतीने वेळोवेळी येणारे लाईट बिल व काहीशी थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाढत्या थकबाकीचा आकडा त्यावरील व्याजामुळे मायणी प्रादेशिक योजनेला घरघर लागली आहे. त्यामुळे शासनाने या थकबाकीबाबत योग्य तोडगा काढून ग्रामपंचायतीला या अवाजवी वीजबिल व वीजबिलावर व्याज यातून सुटका करावी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

(कोट)

योजनेची थकबाकी पाच गावांतून विभागून द्या, अशी मागणी मंत्रालय बैठकीत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत वेळोवेळी केली आहे. चोऱ्या, दरोडे यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे खटाव-माण तालुक्यांतील पथदिव्यांचे तोडण्याचा आदेश मागे घ्यावा, तसेच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे थकीत वीजबिल एकरकमी भरण्याचा तगादा लावू नये, शेतकरीवर्ग अडचणीत जाईल, या बाबींचा सहानुभूती विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.

-डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार