शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

स्मशानभूमीत वृक्षारोपण, जिंतीत अनोखा उपक्रम, माउलीच्या जपल्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:51 IST

फलटण तालुक्यातील जिंती येथील द्बारकाबाई यशवंत जाधव यांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांचे दहावाचे कार्य नुकतेच झाले. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंती येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. यामध्ये बकुळी, पिंपळाचे रोपण करण्यात आले.

ठळक मुद्देवृक्षारोपण करुन माउलीच्या जपल्या स्मृती, जिंतीत अनोखा उपक्रम स्मशानभूमी परिसरात जाधव कुटुंबाकडून बकुळी अन् पिंपळाचे रोपण

जिंती : फलटण तालुक्यातील जिंती येथील द्बारकाबाई यशवंत जाधव यांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांचे दहावाचे कार्य नुकतेच झाले. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंती येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. यामध्ये बकुळी, पिंपळाचे रोपण करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, दिवंगत द्वारकाबाई जाधव यांनी गावामध्ये कित्येक नामकरण समारंभात आपल्या सुंदर स्वरामध्ये पाळणे गायिले आहे. गावात कोणाच्याही घरी कार्यक्रम असल्यास हिरीरीने सहभाग घेणाऱ्या द्विारकाबाई यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चिात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा प्रदीप प्राथमिक शिक्षक आहे.राज्यातील कित्येक जिल्ह्यात दुष्काळाने होरपळून निघत आहेत. त्यातून सातारा जिल्हाही सुटलेला नाही. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर वृक्षारोपण करणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचा विचार पुढे आहे. त्यानुसार जाधव कुटुंबियांनी जिंती गावातील स्मशानभूमी परिसरात बकुळी, पिंपळाच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी डॉक्टर साळुंखे, बाबुराव बोबडे, सदाशिव लोखंडे, योगेश जाधव, तुषार रणवरे, विकास बोबडे यांचे खूप मोठे सहकार्य लाभले.

दुष्काळाची गंभीर समस्या भेडसावत असतात. कडक उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी वृक्षारोपणासारख्या ऊपक्रम करणे आवश्यक आहे.- प्रदीप जाधव

टॅग्स :environmentवातावरणSatara areaसातारा परिसर