शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

कऱ्हाड : ईडब्ल्यूएस ही सवलत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्व प्रवर्गांसाठी असून, मराठा समाज हा त्यातील केवळ घटक आहे. मराठा ...

कऱ्हाड : ईडब्ल्यूएस ही सवलत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्व प्रवर्गांसाठी असून, मराठा समाज हा त्यातील केवळ घटक आहे. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून, आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रमुखांनी याबाबत तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

कऱ्हाड येथे बुधवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ईडब्ल्यूएस ही सवलत केवळ मराठा समाजासाठी नाही. सर्व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांसाठी ही सवलत आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा मुद्दा आणि ही सवलत या दोन वेगळ्या बाबी आहेत. या सवलतीत मराठा समाज हा केवळ घटक आहे. मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही. सध्या मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि पदोन्नती या संदर्भात राज्य सरकारच्या प्रमुखांनी तातडीने मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्वपक्षीय आमदार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वाेच्च न्यायालयात आरक्षण का टिकले नाही? राज्य सरकार कोठे कमी पडले आहे का? काही त्रुटी राहिल्या आहेत का? या संदर्भाने सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा करत आहोत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण दिले, त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. राणे समितीतही आम्ही काम केले आहे. त्या आरक्षणात थोडा बदल करून देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकले. त्यानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले. येथील न्यायाधीशांच्या बेंचने मराठा आरक्षण रद्द केले. त्यावर घटनात्मक, कायदेशीर काय तरतूद करता येतील, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्याला वेळ लागत असेल तर दरम्यानच्या काळात मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी, शैक्षणिक सवलतीसाठी दुसरी काही पर्यायी व्यवस्था करता येईल का, याचाही विचार करण्याची गरज असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले.

फोटो : ०२केआरडी०४

कॅप्शन : कऱ्हाड येथे बुधवारी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली.