शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सरकारने योग्य बाजू न मांडल्याने पुन्हा मराठा आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

पुसेगाव : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते ...

पुसेगाव : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल झाली. नेमकी याचिकेवर सुनावणी न झाल्याने तसेच सध्याच्या सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण पुन्हा रद्द झाले,’ असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पुसेगाव येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात मराठा आरक्षण आणि भविष्यात लढायची आरक्षणाची लढाई याविषयी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, सेवागिरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रणधीर जाधव, ॲड. श्रीकृष्ण जाधव, राहुल पाटील, टी. एन. जाधव, अंकुश पाटील, रोहन देशमुख उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘मिळालेले मराठा आरक्षण २०१२ मध्ये रद्द झाले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने समाजाची रेकॉर्डब्रेक आंदोलने झाली. फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. उच्च न्यायालयाने ते आरक्षण योग्य असल्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आत्ताच्या सरकारने युक्तिवाद करण्यासाठी कनिष्ठ वकील पाठवले. न्यायालयाने मराठीमधील कायदा इंग्लिशमध्ये भाषांतरीत करून देण्याचे आदेश दिले. त्यासाठी सरकारने चार महिने वेळ घेतला. प्रकरण न्यायालयात असल्याने सध्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळ शांत राहिले. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर युक्तिवाद न होता विविध समित्यांच्या निष्कर्षांवर झाला. लार्जर बेंचमध्ये आरक्षण नाकारलेले न्यायाधीश होते. सध्याचे सरकार बाजू मांडण्यात कमी पडले. ५० टक्क्यांवरील आरक्षण केंद्राकडे नसून राज्यांकडे आहे. एकदा दिलेले आरक्षण पुन्हा काढून घेणे चुकीचे आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.’

चौकट

सहनशीलतेचा अंत

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने शांततेत आंदोलने केली, मोर्चे काढले. आता आमचा संयम संपत चालला आहे. यापुढे आमचा समाज रस्त्यावर उतरेल, तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकेल. लोकशाहीत संघर्षाशिवाय काही मिळत नाही. मराठा समाज आता टोकाचा संघर्ष करायला एका पायावर तयार आहे,’ अशा भावना ॲड. श्रीकृष्ण जाधव, टी. एन. जाधव, अंकुश पाटील यांनी व्यक्त केल्या.

फोटो :

पुसेगाव येथे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित चर्चासत्रात हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका मांडली. (छाया : केशव जाधव)