शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कास डोंगरमाथ्यावर निसर्गाने फुलविले आरोग्यपूर्ण दान, रानोरानी दुर्मीळ रानभाज्या 

By दीपक शिंदे | Updated: June 28, 2023 14:09 IST

रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत

पेट्री : शहराच्या पश्चिमेस दुर्गम, डोंगराळ भागातील कास परिसरासह आसपासच्या डोंगररांगात निसर्गाने दिलेले सर्वात मोठे, आरोग्यदृष्ट्या उत्तम दान म्हणजे मान्सून सक्रिय होत असताना अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, अनुभवी व्यक्ती रानोरानी दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. या रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तींच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.काही थंड तर काही उष्णवर्गीय रानभाज्या परिसरात उपलब्ध होत असतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खातात. याच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोवळी पाने शिजवून कुरडूची भाजी केली जाते. ही भाजी खोकला, कफ कमी करण्यासाठी गुणकारी असते. आळू, भारंगी, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणाऱ्या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नसल्याने पावसाळा ऋतूत भाज्यांचे सेवन केल्याने शरीरास आरोग्यदृष्ट्या महत्वाच्या ठरतात.             पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येण्यास सुरुवात होते. रानभाज्या दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. सध्या कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात या रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामस्थ या भाज्यांचा समावेश आहारात करतात. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणे म्हणजे फारच दुर्मीळ. जवळच्या बाजारपेठेत देखील ग्रामस्थांकडून या रानभाज्या विक्रीस नेल्या जातात.कोणत्याही खताविना उगवून आलेल्या या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणीच असते. चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. परंतु, एकसारख्या दिसणाऱ्या काही वनस्पती विषारीदेखील असू शकतात. म्हणून जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तीच या रानभाज्या शोधून आणतात. या रानभाज्यांची भाजी कशा पद्धतीने करायची याची माहितीदेखील इतरांना देतात.

डोंगरातील निसर्गतः उगवलेल्या या रानभाज्या आरोग्यास फायदेशीर आहेत. डोंगरातील शेंडवल, भारंगीसारख्या अनेक रानभाज्या आम्ही आवडीने खातो. या रानभाज्या कसलेच कष्ट न करता आपोआप उगवतात. पावसाळ्यातील रानभाज्या निसर्गाचे एक प्रकारे वरदानच आहे.  - कृष्णा आखाडे, कुसुंबीमुरा, ता. जावळ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठार