शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कुटुंबे पाच वर्षांपासून कॅशलेस

By admin | Updated: February 15, 2017 22:41 IST

कोयना धरण परिसरातील चित्र : ‘कोअर आणि बफर झोन’च्या जाचक अटी जनतेच्या मुळावर !

प्रवीण जाधव ल्ल नाटोशीपाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील लोकांनी १९६० च्या दरम्यान कोयना धरण बांधत असताना आपली जमीन, घरे कोयना धरणासाठी मोठ्या मनाने शासनाच्या स्वाधीन केल्या आणि आपला जमिनीवरील हक्क सोडला. त्या बदल्यात शासनाकडून दिलेल्या अल्प जमिनीवर स्वत:चा संसार पुन्हा उभारला. यातील काहीजण विस्थापित झाले तर काहींचे प्रश्न अजून शासन दरबारी पडून आहे.डोंगरदऱ्याचा आसरा घेऊन आणि येथील भौगोेलिक आपत्तीचा सामना करत काही कुटुंबे राहिली. व त्यांना देण्यात आलेल्या जमिनीतून कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा रेटत होती़ या डोंगरदऱ्यात कोणत्याही सुविधा नसतानाही भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आपले जीवन फुलविण्याचे काम तेथील ग्रामस्थ करत होते. कोयना धरणाच्या माध्यमातून मोडलेला संसार पुन्हा बहरत असतानाच पुन्हा एकदा त्यांच्या संसारावर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या रुपाने पुन्हा एकदा संकट कोसळले़आधी कोयना धरण, मग अभयारण्य अन् आता व्याघ्र प्रकल्प, यामुळे कोयना धरण परिसरातील लोकांवर पुन्हा एकदा विस्थापनाचं भूत मानगुटीवर बसलेलं आहे़ ज्यांनी या कोयना परिसरातील डोंगरदऱ्यांवरील झाडांवर प्रेम केले. आपल्या मुलाप्रमाणे त्यांचे संगोपनही केले, हे जगंल आपले आहे, या भावनेतून त्यांचे रक्षण केले तेच जंगल आता तेथील जनतेच्या मुळावर उठलेले आहे. कोयना धरणाच्या जखमा अजूनही ओल्याच असतानाच ‘कोअर आणि बफर झोन’च्या रुपात येथील लोकांच्या जखमांवर मीठ चोळताना दिसत आहे. कोयना धरणापासून तीन किलोमीटर अंतर असणाऱ्या हुंबरळी गावातील रमेश गणपत देसाई या व्यावसायिकासमोरील संकटामध्ये वाढ होताना दिसत आहे़ देसार्इंना कोयना धरणात गेलेल्या जमिनीच्या बदल्यात हुंबरळी येथे तीन एकर शेती देण्यात आली होती. या जमिनीतून नाचणी आणि भात हीच प्रमुख पिके घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते़ त्यांना शेती करताना वन्यप्राण्यांचा त्रासदेखील होत होता. त्यासाठी स्वत:कडे आणि गावातील लोकांनी वन्यप्राण्यांपासून स्वत:चे रक्षण व्हावे म्हणून बंदूक परवानेही काढले. त्यांनी कोयनेला लाभलेल्या निर्सगसंपन्नतेचा फायदा घेण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉटेल व्यवसाय सुरू केला; परंतु २०१२ पासून ‘कोअर आणि बफर झोन’ प्रकल्पापासून व्यवसाय अडचणीत आला़ यातच त्यांना किडनी विकाराने ग्रासले़ वडिलोपार्जित शेती विक्रीसाठी काढली तरी कोण विकत घेण्यासाठी तयार नाही़ बँकेकडे जमीन तारण ठेवून वैद्यकीय खर्चासाठी कर्ज काढायचे म्हटले तरी कर्ज बँक देत नाही, अशा अवस्थेत सापडलेले देसाई यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानकडून मदतीकरिता आवाहनही केले आहे़ परंतु त्यांना शासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही़ देसाई यांच्यासारखे अनेक कुटुंब या कोअर झोनमध्ये मरण यातना भोगत आहेत. कुणाच्या मुलांचे शिक्षण, लग्न ंिकंवा वैद्यकीय खर्च करणेही अवघड झाले आहे़ या अत्यंत जाचक अटी असतानाही या परिसरातील ग्रामस्थ शांतपणे आपले जीवन जगत असताना सर्वसामान्य जनतेला मरण यातना सोसाव्या लागत आहेत़ या कोयना परिसरातील कोअर झोनमधील शासन जमिनीचा दर खूपच कमी आहे़ सध्याचा रेडी रेकनर दर फारच कमी आहे़ त्यामुळे तेथील दर वाढवून मिळावेत़ शासनाकडून अध्यादेश निघाल्यापासून कोअर झोनमधील गावांमध्ये शासनाच्या वतीने कोणतेही रस्ता, पाणी, वीज व शाळा या माध्यमातून गेली पाच वर्षे विकासकामे झालेले नाही़ पर्यटन व्यवसायावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे़ त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून येथील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत होता, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे़ तसेच शासनानेदेखील मानववस्तीचा भाग वगळून ज्याठिकाणी फक्त जंगल आहे, तेथील भाग वाघाकरिता आरक्षित गेला तर किमान त्यांच्या अडचणी तरी दूर होतील़ शासनाने अडचणी दूर कराव्यात...कोअर आणि बफर झोन मधील ग्रामस्थ गेली पाच वर्षे कॅशलेस जीवन जगत आहेत़ या परिसरातील लोकांना कॅशलेस जीवन जगताना अनेक अडचणी येत आहेत़ तर शासनाने त्वरित येथील ग्रामस्थांच्या कोअर झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणीमधून मुक्ती द्यावी, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे़