‘मनो’,‘धैर्य’च ठरतंय प्रस्थापितांची डोकेदुखी!
By Admin | Updated: September 22, 2014 22:03 IST2014-09-22T20:55:59+5:302014-09-22T22:03:05+5:30
कऱ्हाड उत्तर : अनेकांचे देव पाण्यात; पण कोण-कोण उतरणात रिंगणात ?

‘मनो’,‘धैर्य’च ठरतंय प्रस्थापितांची डोकेदुखी!
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -आघाडी, महायुतीतील घोळ संपता संपेना; पण उत्तरेत स्वाभिमानीचे मनोज घोरपडे व काँग्रेसच्या धैर्यशील कदमांच्या प्रचार रणधुमाळीने राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांची मात्र डोकेदुखी वाढत आहे़
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीवेळी पुनर्रचना झाली़ कऱ्हाड शहरासह १४ गावे उत्तरेतून दक्षिणेत आली़, तर सातारा तालुक्यातील दोन व खटाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट उत्तरेला नव्याने जोडण्यात आले़ नव्या मतदारसंघाचा आवाका नव्या उमेदवाराला आला नाही़ परिणामी, बंडखोर उमेदवार येथे विजयी झाला़
गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील कदमांनी काँग्रेसचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यांनी संवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन संपर्क साधला़ त्याला मिळालेला प्रतिसाद प्रस्थापितांना नक्कीच विचार करायला लावणारा आहे़
त्यातच गेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब पाटलांच्या कोअर कमिटीत असणाऱ्या मनोज घोरपडेंचा ‘स्वाभिमान’ जागा झालेला दिसतोय़ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ते प्रचाराला लागलेत़ घोरपडेंच्च्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्या आहेत. सातारा तालुक्यातील उमेदवार असल्याने गेल्या निवडणुकीत प्रस्थापितांना येथून मिळालेले मतदान यंदा किती मिळणार, हाही महत्त्वाचा भाग आहे़
आघाडी-महायुतीत जागावाटपाचा घोळ सुरूच आह़े़ उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला तरी धैर्यशील एक ‘कदम’ मागे घेतील, असे वाटत नाही़ महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडेही गेला तरी घोरपडे अपक्ष लढणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत़ त्यामुळे विद्यमान आमदारांच्या
कार्यकर्त्यांची धाकधूक वाढतेय, हे
नक्की!
‘मनस’चे केंजळेही तयारीत..
महायुतीतला जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने सेना भाजपच्या इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे़ भाजपचे इच्छुक उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचुपते यांचे जावई धैर्यशिल पाटील-शिरगावकर उमेदवारी अर्जही घेवून गेलेत़ सेनेचे समिर जाधव इच्छुक आहेतच तर मनसेच्या राजेंद्र केंजळे यांनी नागठाणेत नुकताच जोरदार मेळावा घेवून उमेदवारीचे संकेत दिले आहेत़ त्यामुळे उत्तरचं ‘उत्तर’ कोणकोण शाधणार ? याचा शोध घेणे अवघड बनले आहे़