शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडची जनता भूलथापांना बळी पडणार नाही! - सचिन पायलट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:53 IST

कऱ्हाडात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता सभा

कऱ्हाड : ‘भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते साम, दाम आणि दंड याचा वापर करीत आहेत. कऱ्हाडातही मतदारांना भुलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कऱ्हाडची जनता सुज्ञ असून, विरोधी उमेदवाराच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाच येथील मतदार साथ देतील,’ असा विश्वास राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला.कऱ्हाडच्या शिवतीर्थ चौकात महाविकास आघाडीचे कऱ्हाड दक्षिणचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे माजी खासदार विनयकुमार सोरके, छत्तीसगडचे श्री नाटा, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवार, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सुरेश जाधव, शारदा जाधव, भानुदास माळी, शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार सचिन पायलट म्हणाले, ‘राज्यात सध्या भाजप आणि युतीचा मुख्यमंत्री आहे. मात्र, भाजपचा एकही नेता एकनाथ शिंदेच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री राहतील, असे बोलत नाही. त्यांच्यात पदासाठी संघर्ष सुरू आहे. पैसा आणि पदासाठी ते लढत आहेत. जनतेने ज्या-ज्यावेळी संधी दिली त्या-त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ विकास साधला. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात आणि राज्यात मंत्री होते. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्याचा कारभार पाहिला आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कसलाच आरोप झालेला नाही. स्वच्छ चारित्र्य असलेला हा नेता या भागाला लाभला असून, या नेत्याला विधानसभा निवडणुकीत येथील मतदार निश्चित साथ देतील,’ असा विश्वासही सचिन पायलट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आमदार बाळासाहेब पाटील, ‘लोकसभेनंतर यांनी राज्यात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेवर महाविकास आघाडीतील कोणीही काहीही बोलले नाही. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ही योजना बंद होईल, असा अपप्रचार यांनी केला. याउलट आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेतून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाकाकी यांचा विचारांचा वारसा त्यांनी जपला आहे. त्यांच्या या विचाराला येथील जनतेने साथ द्यावी.’

जनतेनेच या सरकारला ‘नापास’ ठरवले!यावेळची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरणारी निवडणूक आहे. गत दहा वर्षे भाजपने महाराष्ट्रावर राज्य केले. मध्यंतरी अनेक स्थित्यंतरे झाली. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात एवढा घोडेबाजार कोणी पाहिला नव्हता जेवढा मोठा घोडेबाजार राज्यात झाला. त्यामुळे हे अवैधानिक आणि अवैध सरकार उलथवून टाकणे गरजेचे आहे. या सरकारवर सर्वाेच्च न्यायालयाने काही निर्णय घेणे टाळले आहे. कायदा मोडला का, घटना मोडली का हे अजूनही जनतेला कळालेलं नाही. या सरकारच्या दहा वर्षांच्या प्रगतीपुस्तकावर महाराष्ट्रातील जनतेने ‘नापास’चा शेरा मारला असल्याचा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-south-acकराड दक्षिणSachin Pilotसचिन पायलटPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024