शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कऱ्हाडची जनता भूलथापांना बळी पडणार नाही! - सचिन पायलट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:53 IST

कऱ्हाडात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराची सांगता सभा

कऱ्हाड : ‘भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत ते साम, दाम आणि दंड याचा वापर करीत आहेत. कऱ्हाडातही मतदारांना भुलविण्याचे काम सुरू आहे. मात्र, कऱ्हाडची जनता सुज्ञ असून, विरोधी उमेदवाराच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाच येथील मतदार साथ देतील,’ असा विश्वास राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला.कऱ्हाडच्या शिवतीर्थ चौकात महाविकास आघाडीचे कऱ्हाड दक्षिणचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे माजी खासदार विनयकुमार सोरके, छत्तीसगडचे श्री नाटा, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवार, ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सुरेश जाधव, शारदा जाधव, भानुदास माळी, शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार सचिन पायलट म्हणाले, ‘राज्यात सध्या भाजप आणि युतीचा मुख्यमंत्री आहे. मात्र, भाजपचा एकही नेता एकनाथ शिंदेच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री राहतील, असे बोलत नाही. त्यांच्यात पदासाठी संघर्ष सुरू आहे. पैसा आणि पदासाठी ते लढत आहेत. जनतेने ज्या-ज्यावेळी संधी दिली त्या-त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ विकास साधला. पृथ्वीराज चव्हाण केंद्रात आणि राज्यात मंत्री होते. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्याचा कारभार पाहिला आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कसलाच आरोप झालेला नाही. स्वच्छ चारित्र्य असलेला हा नेता या भागाला लाभला असून, या नेत्याला विधानसभा निवडणुकीत येथील मतदार निश्चित साथ देतील,’ असा विश्वासही सचिन पायलट यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आमदार बाळासाहेब पाटील, ‘लोकसभेनंतर यांनी राज्यात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेवर महाविकास आघाडीतील कोणीही काहीही बोलले नाही. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ही योजना बंद होईल, असा अपप्रचार यांनी केला. याउलट आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेतून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. दिवंगत आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाकाकी यांचा विचारांचा वारसा त्यांनी जपला आहे. त्यांच्या या विचाराला येथील जनतेने साथ द्यावी.’

जनतेनेच या सरकारला ‘नापास’ ठरवले!यावेळची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरणारी निवडणूक आहे. गत दहा वर्षे भाजपने महाराष्ट्रावर राज्य केले. मध्यंतरी अनेक स्थित्यंतरे झाली. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात एवढा घोडेबाजार कोणी पाहिला नव्हता जेवढा मोठा घोडेबाजार राज्यात झाला. त्यामुळे हे अवैधानिक आणि अवैध सरकार उलथवून टाकणे गरजेचे आहे. या सरकारवर सर्वाेच्च न्यायालयाने काही निर्णय घेणे टाळले आहे. कायदा मोडला का, घटना मोडली का हे अजूनही जनतेला कळालेलं नाही. या सरकारच्या दहा वर्षांच्या प्रगतीपुस्तकावर महाराष्ट्रातील जनतेने ‘नापास’चा शेरा मारला असल्याचा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-south-acकराड दक्षिणSachin Pilotसचिन पायलटPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024