शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

जावळीतील संवेदनशील गावांवर नजर

By admin | Updated: August 3, 2015 21:50 IST

भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी : पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

कुडाळ : जावळी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी ३३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मंगळवारी २३ ग्रामपंचायतींसाठी मतदानप्रक्रिया पार पडत आहे. त्यादृष्टीने निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून, निवडणूक होत असलेल्या गावांमधील राजकीय हालचालींवर प्रशासनाची करडी नजर आहे. तर २३ पैकी ७ ग्रामपंचायती या संवेदनशील असल्यामुळे अशा गावांवर पोलिसांनी नजर ठेवून सतर्क राहण्याचे आदेश तहसीलदार रणजित देसाई यांनी दिले आहेत.तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावांतर्गत असलेल्या गटातटांमध्ये होताना दिसतात. त्यामुळे गावांतर्गत गटतट हे प्रतिष्ठेने निवडणूक लढविताना दिसून येतात. त्यामुळे प्रसंगी वादविवादाचे प्रसंगदेखील ओढावतात. गेल्या निवडणुकीत वाद झाल्यामुळे काही गावांमधील ग्रामस्थांनी तहसीलदार देसाई यांना समक्ष भेटून गत निवडणुकीत झालेल्या प्रकाराची माहिती दिली व भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी शक्य त्या उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी केली.त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देसाई यांनी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने जी नियमावली केली आहे, त्याप्रमाणे मतदान करून घ्यावे, तसेच पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहून संवदेनशील गावांवर नजर ठेवून राहण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)तालुक्यात ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्या शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती घबरदारी घेतली आहे. त्यानुसार सर्व यंत्रणेला सूचना दिल्या गेल्या आहेत.- रणजित देसाई, तहसीलदार, जावळी.तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडल्या जाव्यात, तसेच संवेदनशील गावांसह राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक होत असलेल्या गावांवर आमची नजर असून, तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार. - समाधान चवरे, सहायक पोलीस निरीक्षक