शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
5
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
6
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
7
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
8
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
9
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
10
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
11
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
12
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
13
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
14
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
15
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
16
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
17
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
18
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
19
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
20
वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता; महापालिका पुन्हा अॅक्शन मोडवर, विकासकामांवर 'वॉच', अभियंते, पर्यावरण विभागातील अधिकारी, पोलिस करणार पाहणी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’पेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक...भारतात आल्याचे फार मोठे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:48 IST

चीनमध्ये हॉस्पिटलमधून हा आजार जास्त पसरतो आहे. इतर आजारांवर हॉस्पिटलऐवजी घरीच उपाय केले जातात. तेथील डॉक्टरांना आपली भाषा समजत नसल्याचीही मोठी अडचण आहे. - अश्विनी पाटील, चीनमध्ये अडकलेली भारतीय महिला

दीपक शिंदे ।सातारा : चीनमध्ये आलेला कोरोना व्हायरस हा जीवघेणा आहे. पण, तो बरादेखील होऊ शकतो. आत्तापर्यंत १२ ते १५ हजार लोक बरे झाले आहेत. पण मृत्यू झालेल्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे हा आजार केवळ जीवघेणाच आहे, असे आपल्याला वाटते. परदेशात असल्यामुळे एकटेपणा काय असतो याची आम्हाला जाणीव झाली. त्याबरोबरच परकेपणा कायम जाणवत राहिला. भारतात असतो तर काहीच काळजी नव्हती त्यावर कशीही मात केली असती. त्यामुळे कोरोनापेक्षा एकटेपणा अधिक भीतीदायक असल्याचे मत चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक अश्विनी पाटील यांनी व्यक्त केले.

प्रश्न : चीनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ?उत्तर : चीनमधील परिस्थिती अजून जैसे थे आहे. व्हायरस पसरतो आहे. केवळ चीनपुरता मर्यादित न राहता तो आता साऊथ कोरिया आणि इराणमध्येही पसरतो आहे. युरोपिय देशांमध्ये व्हिसाची गरज नसल्याने लोक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात. त्यामुळे हा आजार अधिक पसरतो आहे.

प्रश्न : चीनमध्ये अजून किती भारतीय आहेत?उत्तर : भारतीय दूतावासाने जेवढ्या लोकांना भारतात परत पाठविता येईल. तेवढ्या सगळ्यांना पाठविण्याचा प्रयत्न केला आहे. वुहानमधील बहुतेक लोक भारतात आले आहेत. मात्र, चीनच्या इतर भागातही अजून काही भारतीय असण्याची शक्यता आहे. त्यांनाही भारतात आणण्यासाठी दूतावास प्रयत्न करत आहे.

प्रश्न : खाद्यपदार्थांची उपलब्धता आहे का ?उत्तर : घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण, चीन सरकार सुपर मार्केटच्या माध्यमातून घरापर्यंत उपलब्ध पदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी घेते.

१ महिना ३ दिवस दिव्यत्वाची प्रचितीचीनमध्ये मी एक महिना आणि ३ दिवस एकटी होते. सकाळी उठले की नाष्ट्याची तयारी, स्वयंपाक तयार करणे, व्यायाम करणे, आई - वडील, पती, नातेवाईक यांच्याशी बोलणे यामुळे वेळ जात होता. तरीही भारतात कधी येणार याची हुरहूर लागून राहिलेली होती. जुने चित्रपट पाहणे आणि चीनमध्ये असलेल्या भारतीयांशी काय हवे नको, याबाबत चर्चा करणे असा दिनक्रम होता. आम्ही चीनमध्ये असलेले लोक एकमेकांची काळजी घेत होतो.

नव्याने काही मित्र-मैत्रिणी तयार झाल्या. कोरोना व्हायरस हा शरीरात शिरल्यानंतर त्याला तुम्हाला मारायचे नसते तर तुमच्या शरीरात राहून जगायचे असते. पण, या व्हायरसमुळे ह्युमिनिटी कमी होते आणि न्यूमोनिया होतो. जर कडक ऊन असेल तर हा व्हायरस फार काळ जगू शकत नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत