शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

Lok Sabha Election 2019 : 'जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत उदयनराजेंशी समोरा-समोर बोलेन-नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 5:06 PM

लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत

ठळक मुद्देमिशी मर्दाची निशाणी; संसदेतील उपस्थिती आणि मांडलेल्या प्रश्नांबाबत केली विचारणासाताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही

सातारा : ‘लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत. आता मी २३ प्रश्न त्यांना विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्पष्ट केली नाहीत तर समोरासमोर बोलायलाही माझी तयारी आहे,’ असे जाहीर आव्हान शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पाटील म्हणाले, ‘उदयनराजेंनी संसदेत १० वर्षे खासदार म्हणून काम केलं. त्यांनी या काळात किती प्रश्न विचारले?, त्यांची संसदेतील हजेरी किती काळ होती?, जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याकरिता त्यांनी किती तास चर्चेत सहभाग घेतला?, जीएसटी आणि नोटबंदीच्या विषयांवर ते टीका करत आहेत, मग या निर्णयांमुळे देशातील जनतेचे काय नुकसान झालं, याबाबत त्यांनी संसदेत मत मांडलं का?, त्यांनी खासदार निधीचा वापर नेमका कोणत्या तालुक्यात आणि किती केला?, दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी जिंकल्या होत्या. त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींची त्यांनी वचनपूर्ती केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वंशज असल्याचे सांगतात, मग प्रतापगडाची दुरवस्था दूर करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली?, साताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही?, आदी प्रश्न मी उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे उदयनराजेंनी द्यावीत.’

उदयनराजे भोसले दहा वर्षे खासदार होते. मात्र, त्यांचे कार्यालयही साताºयात नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर त्यांच्या राजवाड्याबाहेर जाऊन थांबावे लागते. त्यातूनही महाराज भेटतील, याची शक्यता अधांतरिच असते. सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. संसदेच्या माध्यमातून या शेतकºयांचे प्रश्न का सोडवता आले नाहीत?, राजवाड्यात अनेकदा चोºया झाल्या; पण एकाही चोरीबाबत खासदार उदयनराजेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० या आरटीओ रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांना टोलनाका मोफत का केला नाही. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांचे करोडो रुपये खासगी इन्व्हेस्टिंग कंपन्यांत अडकले आहेत, त्यांच्याबाबतही आवाज उठवला नाही. मात्र मी पुढच्या काळात हे प्रश्न धसास लावणार आहे. माझ्या प्रश्नांबाबत समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

 

खासदार झालो तर पूर्णवेळ जन्मभूमीसाठी

खासदार झाल्यानंतर मुंबईत राहणार की साताºयात ? या प्रश्नाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा जिल्हा ही आहे. आमदार असताना या जन्मभूमीसाठी निधी दिला. त्यामुळे खासदार झालो तरी जास्तीत जास्त वेळ हा सातारा जिल्ह्यासाठीही देईन.’

नरेंद्र पाटील फोटो वापरावा

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले