शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

साताऱ्यात पावसाचा जोर कमी; पण, धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:58 IST

आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुवांधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु, धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काही धरणांतून विसर्ग सुरू झालाय. तर कोयनेतील साठा ५० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. २४ तासांत धरणात चार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत होता. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना घराबाहेरही पडणे मुश्कील झाले होते. तसेच रस्त्यावर दरडी कोसळणे, पुलावरुन पाणी वाहणे यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे ५७ आणि महाबळेश्वरला १४३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनेला १७८२, नवजा २१८० आणि महाबळेश्वर येथे सर्वाधिक २३१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस