शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

साताऱ्यात पावसाचा जोर कमी; पण, धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:58 IST

आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुवांधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु, धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काही धरणांतून विसर्ग सुरू झालाय. तर कोयनेतील साठा ५० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. २४ तासांत धरणात चार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत होता. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना घराबाहेरही पडणे मुश्कील झाले होते. तसेच रस्त्यावर दरडी कोसळणे, पुलावरुन पाणी वाहणे यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे ५७ आणि महाबळेश्वरला १४३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनेला १७८२, नवजा २१८० आणि महाबळेश्वर येथे सर्वाधिक २३१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस