शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

साताऱ्यात पावसाचा जोर कमी; पण, धरणसाठ्यातील पाणीपातळी वाढू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 15:58 IST

आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे

सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुवांधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु, धरणांतील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काही धरणांतून विसर्ग सुरू झालाय. तर कोयनेतील साठा ५० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. २४ तासांत धरणात चार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत होता. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांना घराबाहेरही पडणे मुश्कील झाले होते. तसेच रस्त्यावर दरडी कोसळणे, पुलावरुन पाणी वाहणे यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता.आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच पेरणीच्या कामालाही वेग येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नवजा येथे ५७ आणि महाबळेश्वरला १४३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनेला १७८२, नवजा २१८० आणि महाबळेश्वर येथे सर्वाधिक २३१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस