शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पावसाळ्यापूर्वी पूल होण्याची शक्यता कमीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

पेट्री : गत दोन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या ...

पेट्री : गत दोन वर्षांपासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या भिंतीवरून मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी पुलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत हा पूल प्राथमिक अवस्थेत असून, हा पूल पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता फारच कमी असल्याने बामणोली भागातील सर्व गावे आणि कास धरणाच्या पलीकडील तांबी, जुंगटी परिसरातील गावांची वाहतुकीची कोंडी होणार आहे.

कास धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना सध्या धरणातील पाणी बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या सांडव्याचे काम चालू आहे. या सांडव्यावरूनच कास गावालगतच्या पुलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम पायातच असून, या परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. जेमतेम पंधरा दिवस ते तीन आठवड्यांचा कालावधी उन्हाळ्याचा शिल्लक असून, एवढ्या दिवसात पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कास धरणाचे कामही संथगतीने सुरू असून, तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाणारा जुना ओढा नवीन धरणाच्या भिंतीत गेला आहे. त्यामुळे पहिला पाण्याचा प्रवाह असणाऱ्या जागेवर भराव टाकून रस्ता ओढ्याच्या पलीकडे काढला आहे. त्या ठिकाणीही पाणी जाण्यासाठी भरावाखाली मोऱ्या नसल्याने पाणी पलीकडे कसे जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या कच्चा असणारा मातीचा रस्ता पक्का करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जात असले तरी पावसापूर्वी ही सर्व कामे न झाल्यास बामणोलीसह कास परिसरातील गावांना वाहतुकीसाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जाते.

कोट...

सध्या धरणाचे काम चालू असलेल्या परिसरातून कच्चा रस्ता वाहतुकीसाठी सुरू असून, थोडासा पाऊस झाला तरी मातीमुळे चिखल तयार होतो. चिखलात गाड्या चालवणे अवघड बनत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. मागील एक-दोनदा झालेल्या वळीव पावसात वाहने चिखलात फसल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पक्का रस्ता तयार करण्यात यावा.

-विष्णू कीर्दत, माजी अध्यक्ष, कास वनसमिती

कोट

कास धरणावरील रस्ता पक्का न झाल्यास रस्त्यावरील चिखलात भात लागण करण्याची वेळ येणार असून, वेळ हातात आहे तोच येथील कामे तत्काळ करावीत.

-राजेंद्र संकपाळ, माजी सरपंच, बामणोली