शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सांगलीकडून सिंचन मागणी कमी; कोयना धरणातून विसर्ग कमी केला

By नितीन काळेल | Updated: November 3, 2023 14:36 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे यंदा धरण भरलेच नाही 

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाल्याने काेयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यानुसार आता पायथा वीजगृहाचे एक युनीटच सुरू करुन १०५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कमी पर्जन्यमानामुळे धरण भरले नसल्याने सध्या ८७ टीएमसीवरच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला नसलातरी पिण्यासाठी अनेक गावांना टॅंकर सुरू आहेत. यापुढेही टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतच जाणार आहे. तर पावसाअभावी पश्चिम भागातील बहुतांशी धरणे भरली नाहीत. त्यातच कोयना धरणाचीपाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. मात्र, धरणक्षेत्रातच पाऊस कमी झाल्याने ९४ टीएमसीपर्यंतच पाणीसाठा झालेला. सध्या दुष्काळीस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २७ आॅक्टोबरपासून कोयनेच्या पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू करुन २१०० क्यूसेक वेगाने सांगलीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मागील आठ दिवस सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र, आता सिंचनासाठी मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोनपैकी एक युनीट बंद करण्यात आले आहे. सध्या एकाच युनीटमधून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.

दरम्यान, यावर्षी कोयना धरण भरले नसल्याने पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे तरतुदीनुसार पाणी सोडावे लागणार आहे. परिणामी सिंचन आणि वीजनिर्मिती पाणी कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

काेयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यासाठीही मिळते. सांगली जिल्ह्यासाठी आतापर्यंत दोनवेळा पाणी सोडण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणीSangliसांगली