शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

By सचिन काकडे | Updated: August 16, 2023 16:36 IST

जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असून, याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. बुधवारी सकाळी शहरातील डोंगरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना ऐन पावसात टंचाईचा सामना करावा लागला.कास योजनेच्या जलवाहिनीला आटाळी व कासाणी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमुळे सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून, पाणीवितरण व्यवस्थेचा महत्वाचा दुवा असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्ण विस्कळीत झाला आहे.पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्याचे काम गुरुवारी (दि. १७) हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी १० ते १२ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा या भागासह कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.शुक्रवारी (दि. १८) सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, कोटेश्वर टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार (दि. १९) व रविवारी (दि. २०) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी बापट यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीRainपाऊस