शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘किसन वीर’ची ऊसबिले, ऊसतोडणी, पगार भागवा; निवडणुकीची कसली घाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:06 IST

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गत हंगामातील ऊस बिले, थकलेले जवळपास दोन वर्षांचे पगार याबाबत शासनाने ...

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गत हंगामातील ऊस बिले, थकलेले जवळपास दोन वर्षांचे पगार याबाबत शासनाने जबाबदारी घ्यावी. दरम्यान, सद्यस्थितीत ‘किसन वीर’च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोडीबाबत इतर कारखान्यांना सूचना केल्या असल्या तरी त्यातूनही ऊस शिल्लक राहिल्यास या उसाची नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी आग्रही मागणी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी केली आहे.यासंदर्भात ज्येष्ठ सभासद बाबासाहेब कदम, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार, सुनील भोसले आदींनी सहकार मंत्री, साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. ‘किसन वीर’मार्फत प्रतापगड आणि खंडाळा असे एकूण तीन कारखाने चालवले जात होते; परंतु सद्यस्थितीत ते बंद असल्याने ऊस उत्पादकांपुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील हंगामातील ऊस बिले, थकीत पगार आदी प्रश्न तसेच आहेत. राज्य शासन यावर उपाय योजनेसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाही. मात्र, या कारखान्याच्या निवडणुकीची मात्र जोरदार हालचाल दिसत आहे. कारखान्यातील सभासदांसमोर एवढे गंभीर प्रश्न उभे आहेत.विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यावर सभासदांना विश्वासात घेऊन काही सांगत नाहीत. पुढील संकट ओळखून आम्ही सहकार मंत्री आणि साखर आयुक्तांना समक्ष भेटून याबाबत योग्य ते नियोजन करण्याची विनंती केली होती. असे स्पष्ट करून या सभासदांनी निवेदनात म्हटले आहे की, एवढे संकट समोर असताना सहकार खात्याला या कारखान्याची निवडणूक एवढी महत्त्वाची का वाटते? आधी सद्यस्थितीतील प्रश्न सोडवा, मग निवडणुकीकडे आपल्या खात्याची शक्ती खर्ची घालावी.

शासन बघ्याच्या भूमिकेत अन् प्रशासनाचे हातावर हात....केवळ निवडणुकीने नव्हे तर सरकारने कठोर पावले उचलून हस्तक्षेप केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, याकडे या सभासदांनी लक्ष वेधले आहे. साखर आयुक्तांनी यासंदर्भात कागदोपत्री निर्देश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कुणाची ..? उन्हाळा वाढत आहे. इतर कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोड करत असल्या तरी निर्धारित वेळेत ऊसतोड होण्यासाठी त्या पुरेशा ठरणार नाहीत. चारही बाजूंनी ऊस उत्पादक आणि कामगार नागवला जात असताना सरकार किती दिवस बघ्याची भूमिका घेणार आहे, असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने