शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘किसन वीर’ची ऊसबिले, ऊसतोडणी, पगार भागवा; निवडणुकीची कसली घाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:06 IST

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गत हंगामातील ऊस बिले, थकलेले जवळपास दोन वर्षांचे पगार याबाबत शासनाने ...

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गत हंगामातील ऊस बिले, थकलेले जवळपास दोन वर्षांचे पगार याबाबत शासनाने जबाबदारी घ्यावी. दरम्यान, सद्यस्थितीत ‘किसन वीर’च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोडीबाबत इतर कारखान्यांना सूचना केल्या असल्या तरी त्यातूनही ऊस शिल्लक राहिल्यास या उसाची नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी आग्रही मागणी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी केली आहे.यासंदर्भात ज्येष्ठ सभासद बाबासाहेब कदम, बाबुराव शिंदे, राजेंद्र शेलार, सुनील भोसले आदींनी सहकार मंत्री, साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. ‘किसन वीर’मार्फत प्रतापगड आणि खंडाळा असे एकूण तीन कारखाने चालवले जात होते; परंतु सद्यस्थितीत ते बंद असल्याने ऊस उत्पादकांपुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील हंगामातील ऊस बिले, थकीत पगार आदी प्रश्न तसेच आहेत. राज्य शासन यावर उपाय योजनेसाठी काहीच पावले उचलताना दिसत नाही. मात्र, या कारखान्याच्या निवडणुकीची मात्र जोरदार हालचाल दिसत आहे. कारखान्यातील सभासदांसमोर एवढे गंभीर प्रश्न उभे आहेत.विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यावर सभासदांना विश्वासात घेऊन काही सांगत नाहीत. पुढील संकट ओळखून आम्ही सहकार मंत्री आणि साखर आयुक्तांना समक्ष भेटून याबाबत योग्य ते नियोजन करण्याची विनंती केली होती. असे स्पष्ट करून या सभासदांनी निवेदनात म्हटले आहे की, एवढे संकट समोर असताना सहकार खात्याला या कारखान्याची निवडणूक एवढी महत्त्वाची का वाटते? आधी सद्यस्थितीतील प्रश्न सोडवा, मग निवडणुकीकडे आपल्या खात्याची शक्ती खर्ची घालावी.

शासन बघ्याच्या भूमिकेत अन् प्रशासनाचे हातावर हात....केवळ निवडणुकीने नव्हे तर सरकारने कठोर पावले उचलून हस्तक्षेप केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत, याकडे या सभासदांनी लक्ष वेधले आहे. साखर आयुक्तांनी यासंदर्भात कागदोपत्री निर्देश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कुणाची ..? उन्हाळा वाढत आहे. इतर कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोड करत असल्या तरी निर्धारित वेळेत ऊसतोड होण्यासाठी त्या पुरेशा ठरणार नाहीत. चारही बाजूंनी ऊस उत्पादक आणि कामगार नागवला जात असताना सरकार किती दिवस बघ्याची भूमिका घेणार आहे, असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने