शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

वाई तालुक्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे ज्वारीचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:08 IST

वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देवाई तालुक्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे ज्वारीचे मोठे नुकसानभीषण संकट : अन्नधान्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बनलाय गंभीर

वाई : वाई तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने वाई तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे भीषण संकट आलेले नाही. डोंगर पठारावरसुद्धा याची भीषणता यावर्षी जाणवत नाही. मात्र, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून मोठ्या प्रमाणात नासाडी करताना दिसत आहेत.

अरगड ज्वारीचे कणीस खाण्यासाठी संपूर्ण ताटे जमीनदोस्त करून खात असल्याने पिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईच्या पश्चिम भागासह संपूर्ण तालुक्यात हजारो एकर जमिनीतील अरगड ज्वारीचे रानडुक्कर व भटक्या प्राण्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे.ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, कांदा, पावटा, वाटाणा, बाजरी यासारख्या निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना याची झळ बसत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

शेतकरी आपल्या शेतात रानडुकरांचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना दिसत आहे. संपूर्ण शेताला साडीने लपेटण्यात येते. तसेच आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधण्यात येतात, थायमेट घालण्यात येते, रात्रभर शेकोटी पेटवून खडा पहारा दिला जातो. तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून पीक फस्त केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी