शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: डोंगरावर राहतो आम्ही; पर्वा कशाची!, नैसर्गिक संकटांकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

By सचिन काकडे | Updated: July 14, 2023 12:51 IST

‘माळीण’च्या घटनेतून बोध घेऊन पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी स्थलांतर करणे गरजेचे

सचिन काकडेसातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्ह्यासह सातारा शहरात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने कानावर येऊ लागल्या आहेत. असे असताना अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांना मात्र याचे कसलेच गांभीर्य नाही. कितीही पाऊस पडूदे, दरड कोसळू दे, जमीन खचू दे, पण आम्ही इथून हलणार नाही, अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.अलीकडे जमिनींना इतका भाव आला आहे की, सर्वसामान्य नागरिक स्वत:चं घर बांधण्याचं स्वप्नदेखील पाहूच शकत नाही. सातारा शहरातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ साताऱ्यात येणारी अनेक कष्टकरी कुटुंबं जिथे जागा मिळेल तिथे पत्र्याचं शेड उभं करून निवाऱ्याची व्यवस्था करतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांत अजिंक्यतारा किल्ला, बोगदा व पॉवर हाऊस परिसरात अशा झोपड्या व घरांची रांग वाढू लागली असून, या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा ठरतो.पालिकेकडून अशा मिळकतदारांना धोक्याची कल्पना दिली जाते. पावसाळ्यात इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचनाही दिल्या जातात. मात्र, संबंधितांकडून या नैसर्गिक संकटाकडे दुर्लक्ष केले जाते. ‘आजवर काही झालं नाही, मग पुढे तरी काय होणार आहे?’ अशी मानसिकता येथील रहिवाशांची झाली आहे.

याचा धोका अधिक

  • अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड असून, ते पडण्याच्या मार्गावर आहे. मुसळधार पाऊस झाल्यास दगडांखालील मातीचे वहन होऊन हे दगड सैल होऊन खाली कोसळू शकतात.
  • वृक्षांची मुळे माती घट्ट धरून ठेवण्याचं काम करतात. मात्र, किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे मातीदेखील हळूहळू सैल होऊ लागली आहे.

ही काही उदाहरणे !

  • सात वर्षांपूर्वी अजिंक्यतारा किल्ल्यावरील एका घरावर महाकाय दगड येऊन आदळला होता. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, घराचे प्रचंड नुकसान झाले.
  • कोकण वसाहतीत असलेल्या एका घराचा पाया मोठ्या प्रमाणात खचला होता. हे घर पडता-पडता वाचले.
  • चार भिंती मार्गावरील गृहनिर्माण सोसायटीजवळ चार वर्षांपूर्वी दरड कोसळून घरांनी हानी झाली होती.

ही काळजी घ्याच !

  • ‘माळीण’ची घटना आठवली तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात. या घटनेतून बोध घेऊन डोंगर उतारावर राहणाऱ्या नागरिकांना किमान पावसाळ्याचे दोन-तीन महिने तरी नातेवाइकांकडे अथवा पर्यायी ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे. अन्यथा एखादे नैसर्गिक संकट ओढावल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलन