दारू दुकानाच्या स्थलांतराचा भुर्इंजमध्ये ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 21:38 IST2015-08-16T21:38:19+5:302015-08-16T21:38:19+5:30
सोनाईचीवाडीत दारूबंदी : दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब

दारू दुकानाच्या स्थलांतराचा भुर्इंजमध्ये ठराव
सातारा : जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत ग्रामसभा झाल्या. काही ठिकाणी वादाचेही प्रसंग घडले. भुर्इंज येथे दारू दुकान स्थलांतराचा ठराव करण्यात आला. सोनाईचीवाडीत दारूबंदीचा ठराव तर फलटण तालुक्यातील दुधेबावीत कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली.भुर्इंज : सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करण्याबरोबरच भुर्इंज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.येथील छत्रपती शिवाजी मैदानावर सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. महामार्गालगत शैक्षणिक संस्थेच्या वाटेवर असणारे सरकारमान्य देशीदारूचे दुकान स्थलांतरित करून लोकवस्तीपासून दूर नेण्यात यावे, असा ठराव सर्वानुमते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याच्या सूचना सरपंच कांबळे यांनी दिल्या. विविध समाजांची स्मशानभूमी व अंत्यसंस्कार यांचा दाखला देत एकाच स्मशानभूमीत सर्व जाती जमातीच्या लोकांनी अंत्यसंस्कार करावेत, यासाठी सरपंच कांबळे यांनी प्रबोधन कले.
विषय पत्रिकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी विष्णू चव्हाण यांनी केले. चंद्रदीप भोसले यांनी आभार मानले.
मल्हारपेठ : सोनाईचीवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव सर्वांच्या एकमताने मंजूर करण्यात आला. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सोनाईचीवाडी, ता. पाटण येथे उपसरपंच सचिन माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. गावच्या विकासासाठी पहिले पाऊल म्हणून गावातील दारू धंदा बंद करण्यासाठीची सूचना पुढे आली. त्यानंतर सर्वांनुमते ठराव मंजूर करून लगेच अंमलात आणण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामसेवक परमेश्वर पाखरे यांनी शासकीय योजना, अभियान या परिपत्रकांचे वाचन केले. यावेळी जे. के. कदम, शहाजी काळे, आनंदा काळे, सुरेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दुधेबावी : दुधेबावी , ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला पुरेसे ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे वेळेच्या अर्ध्या तासानंतर कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली, अशी माहिती सरपंच ज्योती मोरे यांनी दिली.
यावेळी उपसरपंच श्रीमंत नाळे, पोलीस पाटील हणुमंत सोनवलकर, लता नाळे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, डॉ. एस. पी. इंगवले, डॉ. संतोष कराडे, नाना सोनवलकर, विकास सोनवलकर, दिगंबर सोनवलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेला सुमारे ६५ ग्रामस्थ उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १०० ग्रामस्थ किंवा मतदाराच्या १५ टक्के ग्रामस्थांची उपस्थिती गरजेची असते. तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने आता ग्रामसभा दि. २१ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी
दिली. (वार्ताहर)