शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परतीच्या पावसाने खरीप पिकांची नासाडी--परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:56 PM

मलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे.

ठळक मुद्देहायब्रीड, सोयाबीन, भुईमुगाचे नुकसान; पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असून, या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या पावसाने खरीप हंगामातील हायब्रीड, ज्वारीचे पीक काळे पडत आहे. तर सोयाबीनसह भुईमुगाची पिके कुजत असल्यामुळे हातात आलेल्या पिकांचे वाटोळे होत आहे. एका बाजूला निसर्ग तर दुसºया बाजूला सोयाबीन खरेदी बंद अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या हाताशी आलेला घास हिसकावला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सध्या गडगडाटासह जोरदार पाऊस रोजच हजेरी लावत आहे. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक येत असलेल्या जोराच्या पावसामुळे भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.

पावसाने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काढणीचा हंगाम सुरू असलेल्या सोयाबीन व भुईमूग पीक शेतातच कुजत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच या नगदी पिकांचे वाटोळे होत असल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हायब्रीड, ज्वारी हे खरीप हंगामातील पीक चांगले आले होते. महामार्गाच्या पश्चिमेकडील नांदलापूर, धोंडेवाडी, चचेगावसह अनेक गावांत हायब्रीड ज्वारीचे पीक सध्या जोमात आले आहे. मात्र, सततच्या पावसाने हे पीक काळे पडले आहे. वर्षभराची खाण्याची सोय होणार, अशी आशा लागलेल्या शेतकºयांच्या चिंतेत भरच पडत आह

मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. भेंडी, गवारी यासारख्या शेंगवर्गीय भाजीवर सकाळी पडत असलेल्या धुक्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.गुºहाळाची घरघर थांबलीगणेशोत्सवाच्या मुहूर्तावर चचेगावसह परिसरातील काही गुºहाळ व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महिन्यापासून जोरदार पावसामुळे शेतकºयांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी येत आहे. परिणामी, व्यावसायिकांना गुºहाळाची घरघर थांबवावी लागली आहे. याचा परिणाम म्हणून गुºहाळात काम करण्यासाठी आलेल्या कामगारांचे संसार चालविण्यासाठी गुºहाळ मालकाला पदरमोड करावी लागत आहे. गुºहाळाची घरघर थांबली.सर्वांचा पोशिंदा दुहेरी संकटातएका बाजूला सातत्याने अतिवृष्टीमुळे पिके काढता येत नसल्यामुळे रानातच कुजत आहेत. म्हणून शेतकºयांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करून शेतकºयाने काढलेल्या मालाला हमीभाव देण्यावरून व्यावसायिकांनी सोयाबीन खरेदी बंद केली आहे. अशा संकटालाही शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे. एकूणच सर्वांचा पोशिंदा सध्या दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.