शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:16 IST

धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाहीयंत्रणा सुस्त : वनगळ, मालगावचे शेतकरी संकटात

सातारा : धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे तब्बल ७७ लाख २१ हजार ५०० रुपयांचे तर वनगळमधील १५ शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा महसूल विभागाने केला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पंचनामा केला त्यात मालगावातील शेतकऱ्यांचे एकूण ११ लाख २ हजार ७०० रुपये तर वनगळमधील शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, आम्हाला मदत कधी मिळणार ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. जिल्हा नियोजन समितीची २९ रोजी बैठक होणार आहे.लोकमत याबाबत वृत्तमालिका प्रसिध्द करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने नुकसानीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कुठल्या विभागाने ही मदत करायची, याबाबत महसूल व पाटबंधारे विभाग यांच्यात एकमत पाहायला मिळत नाही.

एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम दोन्ही विभाग करताना दिसत आहेत. कालवा फुटल्यानंतर नुकसान भरपाई देण्याची तरतूद पाटबंधारे विभागाकडे नाही तर ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने महसूल खातेही निर्णय घेत नाही. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर