शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:16 IST

धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे नुकसान लाखोंचे, हातात छदामही नाहीयंत्रणा सुस्त : वनगळ, मालगावचे शेतकरी संकटात

सातारा : धोम धरणाचा डावा कालवा फुटून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या गावांतील ५९ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी हे नुकसान झाले; परंतु या शेतकऱ्यांच्या हाती एक छदामही सरकारने दिलेला नाही. हे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे तब्बल ७७ लाख २१ हजार ५०० रुपयांचे तर वनगळमधील १५ शेतकऱ्यांचे ५ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा महसूल विभागाने केला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने पंचनामा केला त्यात मालगावातील शेतकऱ्यांचे एकूण ११ लाख २ हजार ७०० रुपये तर वनगळमधील शेतकऱ्यांचे १ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविण्यात आले. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून, आम्हाला मदत कधी मिळणार ? असा सवाल येथील नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत. जिल्हा नियोजन समितीची २९ रोजी बैठक होणार आहे.लोकमत याबाबत वृत्तमालिका प्रसिध्द करुन शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत तहसीलदार कार्यालयाने नुकसानीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कुठल्या विभागाने ही मदत करायची, याबाबत महसूल व पाटबंधारे विभाग यांच्यात एकमत पाहायला मिळत नाही.

एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम दोन्ही विभाग करताना दिसत आहेत. कालवा फुटल्यानंतर नुकसान भरपाई देण्याची तरतूद पाटबंधारे विभागाकडे नाही तर ही नैसर्गिक आपत्ती नसल्याने महसूल खातेही निर्णय घेत नाही. या दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी पेचात सापडले आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर