शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कदमांच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट

By admin | Updated: January 28, 2016 00:27 IST

ढेबेवाडीतच म्हणे सादर : जिल्ह्यातल्या नेत्यांना बाजूला ठेवून थेट अजित पवारांशी चर्चा

सातारा : जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम यांनी औंध येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे नेते अजित पवार यांच्या जवळ नाराजी व्यक्त केली. ढेबेवाडीतील कार्यक्रमावेळीच राजीनामा सादर केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी औंधमध्ये करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना उघडे पाडले. जिल्हा परिषदेतील नाराजीनाट्यामुळे भलतेच वादळ उठले आहे. पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्याऐवजी थेट बंडाचे निशाण फडकाविले. आ. शशिकांत शिंदे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जे राजीनामा देणार नाहीत. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अमित कदम व रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. जावळी तालुक्यातील अमित कदम यांनी आ. शिंदे यांच्या विधानावर थेट अजित पवारांकडे तक्रार केली. ढेबेवाडीच्या कार्यक्रमात राजीनामा सादर केला असतानाही जिल्ह्यातील नेत्यांना याची माहिती नसल्याचे आश्चर्यकारक विधान त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत असलेले राजीनामानाट्य भलतेच पुढे आले आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्यावरच हे प्रकरण शेकवण्याचा प्रयत्न कदम यांनी केला. या प्रकारामुळे राष्ट्रवादीतील सुसंवाद कमी होतोय का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमित कदम यांनी पक्षाकडे राजीनामा सादर केला असल्याने आता केवळ रवी साळुंखेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी आदेश दिल्याशिवाय राजीनामा न देण्याचे स्पष्टीकरण साळुंखे यांनी याआधीच केले आहे. आता उदयनराजे हे प्रकरण किती दिवस ताणतायत, त्यावरच साळुंखेंचे भविष्य निर्भर राहणार आहे. उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवून घेण्याची खेळीही उदयनराजे करू शकतात. झेडपीच्या राजीनामा नाट्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)