शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कदमांच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट

By admin | Updated: January 28, 2016 00:27 IST

ढेबेवाडीतच म्हणे सादर : जिल्ह्यातल्या नेत्यांना बाजूला ठेवून थेट अजित पवारांशी चर्चा

सातारा : जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम यांनी औंध येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे नेते अजित पवार यांच्या जवळ नाराजी व्यक्त केली. ढेबेवाडीतील कार्यक्रमावेळीच राजीनामा सादर केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी औंधमध्ये करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना उघडे पाडले. जिल्हा परिषदेतील नाराजीनाट्यामुळे भलतेच वादळ उठले आहे. पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्याऐवजी थेट बंडाचे निशाण फडकाविले. आ. शशिकांत शिंदे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जे राजीनामा देणार नाहीत. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अमित कदम व रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. जावळी तालुक्यातील अमित कदम यांनी आ. शिंदे यांच्या विधानावर थेट अजित पवारांकडे तक्रार केली. ढेबेवाडीच्या कार्यक्रमात राजीनामा सादर केला असतानाही जिल्ह्यातील नेत्यांना याची माहिती नसल्याचे आश्चर्यकारक विधान त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत असलेले राजीनामानाट्य भलतेच पुढे आले आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्यावरच हे प्रकरण शेकवण्याचा प्रयत्न कदम यांनी केला. या प्रकारामुळे राष्ट्रवादीतील सुसंवाद कमी होतोय का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमित कदम यांनी पक्षाकडे राजीनामा सादर केला असल्याने आता केवळ रवी साळुंखेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी आदेश दिल्याशिवाय राजीनामा न देण्याचे स्पष्टीकरण साळुंखे यांनी याआधीच केले आहे. आता उदयनराजे हे प्रकरण किती दिवस ताणतायत, त्यावरच साळुंखेंचे भविष्य निर्भर राहणार आहे. उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवून घेण्याची खेळीही उदयनराजे करू शकतात. झेडपीच्या राजीनामा नाट्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)