शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा, उरमोडीचे पात्र पडले कोरडे; धरणातील पाणी चोरल्याचा आरोप; ‘स्वाभिमानी’चा सिंचन मंडळात ठिय्या 

By नितीन काळेल | Updated: October 30, 2023 18:58 IST

अधिकाऱ्यांना जाब; गोंधळ वाढल्याने पोलिसांची मध्यस्थी 

सातारा : सातारा तालुक्यात कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. मोटारी उघड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी पुरणार नाही. तर दुसरीकडे धरणांतील पाण्याची चोरी झाली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिंचन भवनात अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केले.याबाबत माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यातील सातारा सिंचन मंडळात उरमोडी आणि कृष्णा नदी तसेच कण्हेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाण्यासंदर्भात आंदोलन केले. सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. उरमोडी तसेच इतर धरणांतून पाण्याची चोरी झाली आहे. धरणातील पाण्यामुळे दुष्काळी भागातील तलाव भरुन वाहत आहेत. त्यामुळे धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.

सातारा तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातील विद्युत मोटारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी कमी पडत आहे. कमी पाऊस झाल्यानेही धरणात कमी पाणीसाठा आहे. या पाण्याची सतत चोरी होत राहिल्यास लाभधारक शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे पिकांसाठी घेतलेले कर्ज तसेच इतर कर्जेही भागवता येणार नाहीत. अशाने शेतकऱ्यांसमोर मोठे आऱ्थिक संकट उभे राहणार आहे, असे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. तसेच धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. तसेच यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, पोलिसांना मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अर्जूनभाऊ साळुंखे, रमेश पिसाळ, महादेव डोंगरे, संजय साळुंखे, बापू ढाणे, सुधाकर शितोळे, राजू घाडगे, नितीन घाडगे, तुकाराम शेडगे, चंद्रहार माने, धनाजी घाडगे, हणमंत शेडगे आदी सहभागी झाले होते.

आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाण्यासाठी सिंचन भवनात आॅक्टोबर महिन्यातच दोनवेळा आंदोलन केले आहे. यापूर्वी ९ आॅक्टोबरला आंदोलन झाले होते. मात्र, सोमवरच्या आंदोलनावेळी सिंचन मंडळात वरिष्ठ अधिकारी कोणीच नव्हते. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच धरणातील पाण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते सिंचन भवनातून बाहेर पडले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीDamधरण