शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

कृष्णा, उरमोडीचे पात्र पडले कोरडे; धरणातील पाणी चोरल्याचा आरोप; ‘स्वाभिमानी’चा सिंचन मंडळात ठिय्या 

By नितीन काळेल | Updated: October 30, 2023 18:58 IST

अधिकाऱ्यांना जाब; गोंधळ वाढल्याने पोलिसांची मध्यस्थी 

सातारा : सातारा तालुक्यात कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. मोटारी उघड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी पुरणार नाही. तर दुसरीकडे धरणांतील पाण्याची चोरी झाली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिंचन भवनात अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केले.याबाबत माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यातील सातारा सिंचन मंडळात उरमोडी आणि कृष्णा नदी तसेच कण्हेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाण्यासंदर्भात आंदोलन केले. सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. उरमोडी तसेच इतर धरणांतून पाण्याची चोरी झाली आहे. धरणातील पाण्यामुळे दुष्काळी भागातील तलाव भरुन वाहत आहेत. त्यामुळे धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.

सातारा तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातील विद्युत मोटारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी कमी पडत आहे. कमी पाऊस झाल्यानेही धरणात कमी पाणीसाठा आहे. या पाण्याची सतत चोरी होत राहिल्यास लाभधारक शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे पिकांसाठी घेतलेले कर्ज तसेच इतर कर्जेही भागवता येणार नाहीत. अशाने शेतकऱ्यांसमोर मोठे आऱ्थिक संकट उभे राहणार आहे, असे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. तसेच धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. तसेच यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, पोलिसांना मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अर्जूनभाऊ साळुंखे, रमेश पिसाळ, महादेव डोंगरे, संजय साळुंखे, बापू ढाणे, सुधाकर शितोळे, राजू घाडगे, नितीन घाडगे, तुकाराम शेडगे, चंद्रहार माने, धनाजी घाडगे, हणमंत शेडगे आदी सहभागी झाले होते.

आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाण्यासाठी सिंचन भवनात आॅक्टोबर महिन्यातच दोनवेळा आंदोलन केले आहे. यापूर्वी ९ आॅक्टोबरला आंदोलन झाले होते. मात्र, सोमवरच्या आंदोलनावेळी सिंचन मंडळात वरिष्ठ अधिकारी कोणीच नव्हते. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच धरणातील पाण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते सिंचन भवनातून बाहेर पडले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीDamधरण