शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कोयना धरण ओव्हरफ्लो, यंदा लागला उशिर, पायथा वीजगृह अन् दरवाजातूनही विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:28 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा धरण उशिरा भरले आहे.

ठळक मुद्देकोयना धरण ओव्हरफ्लो, यंदा लागला उशिर पायथा वीजगृह अन् दरवाजातूनही विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा धरण उशिरा भरले आहे.जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण पूर्णपणे अनिश्चित स्वरुपाचे राहिले आहे. जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस दाखल झाला असलातरी त्यानंतर खंड पडला. असे असलेतरी जूनमधील पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला आहे. सर्वच तालुक्यात पिके चांगल्या स्थितीत आहेत. सध्या पीक काढणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाला आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाऊस होत असलातरी पश्चिमेकडे मात्र तुरळक स्वरुपात पडत आहे. मागील १५ दिवसांत तर कोयना, नवजा, कास, बामणोली, महाबळेश्वरसारख्या भागात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत गेली. तर गेल्या १५ दिवसांचा विचार करता मंगळवारी दिवसभरात पश्चिमेकडे चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात वेगोन पाणीसाठा वाढला.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४२८५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयनेतील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरण पूर्ण भरले. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून प्रथम विसर्ग सुरू करण्यात आला.

तर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पायथा वीजगृह १०५० आणि धरणाच्या दोन दरवाजातून ३१८२ असा मिळून ४२३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. त्यातच धरणातील आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत नवजाला ४६ तर यावर्षी आतापर्यंत ४९५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंतच्या २४ तासांत २६ आणि जूनपासून ४९०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सातारा शहरासह परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. मात्र, दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण होते.कोयना, नवजाला ३ हजार मिलिमीटर कमी पाऊस...जिल्ह्यात गेल्यावर्षी जवळपास पाच महिने पाऊस होता. त्यामुळे मागील काही वर्षांतील पावसाचा रेकॉर्ड मोडला गेलेला. त्या तुलनेत यंदा पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला पाऊस कमीच झाला आहे. कोयनेला ३०८५, नवजा येथे ३४४१ आणि महाबळेश्वरला २४०७ मिलिमीटर पाऊस आतापर्यंत कमी झालेला आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर